शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आॅगस्टमधील अतिपावसाचा फटका; शेतमालाचा दर्जा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 15:33 IST

वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतमालाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे.

ठळक मुद्देमुग आणि उडिदाच्या काढणीवरून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतमालास अपेक्षीत भाव मिळेनासे झाले आहेत.खरेदी करण्यास व्यापारी तयार होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतमालाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. मुग आणि उडिदाच्या काढणीवरून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतमालास अपेक्षीत भाव मिळेनासे झाले आहेत. शिवाय काही मालाची खरेदी करण्यास व्यापारी तयार होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात यंदा आॅगस्टच्या अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडला. त्यातच आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जिल्ह्यात धो धो पाऊस कोसळला. या पावसामुळे खरीपातील पिकांना प्रामुख्याने मुग, उडिद आणि सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतमालाचा दर्जाही खालावला आहे. खरीपातील सर्वात कमी कालावधीची पिके असलेल्या मुग आणि उडिदाच्या काढणीवरून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शासनाने घोषीत केलेल्या हमीभावापेक्षा खूप कमी भाव शेतकºयांना मिळू लागले आहेत. त्यातच काही शेतमालाचा दर्जा एवढा खालावला आहे की, व्यापारी त्या शेतमालाची खरेदी करण्यासही तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. मंगरुळपीर बाजार समितीत बुधवारी असा प्रकार पाहायला मिळाला. या बाजार समितीत एका शेतकºयाने लिलावात दोन ते अडीच क्विंटल मुग टाकला होता. मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसल्याने या  मुगाचा रंग उडून चक्क धुरकट झाला होता.  दूरून पाहिल्यास वाळूचा ढीगच आहे, असे वाटत होते. त्यामुळे या मुगाचा लिलावच होऊ शकला नसून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता हा मुग फेकून देणे किंवा गुराला चारणे, एवढाच पर्याय शेतकºयापुढे उरला आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमagricultureशेती