शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पीककर्जाच्या विलंबामुळे वनोजा येथील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 14:47 IST

वाशिम: नागपूर-मुंबई महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसी कायद्यानुसार २०१६-१७ चे कर्ज भरूनही बँंकांकडून त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

ठळक मुद्देखरीपाच्या पेरणीसाठी बँंकांना पीककर्ज तातडीने वितरित करण्याचे आदेश असतानाही त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. नव्याने कर्ज देणे क्रमप्राप्त असतानाही बँका वरिष्ठ स्तरावरून आदेश नसल्याचे कारण पुढे करीत शेतकºयांना वेठीस धरीत आहेत. शेतकºयांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत बँकाना पीककर्ज देण्याबाबत सुचित करण्याची मागणी करणारे निवेदनच सादर केले आहे.

वाशिम: नागपूर-मुंबई महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसी कायद्यानुसार २०१६-१७ चे कर्ज भरूनही बँंकांकडून त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेतकरी ऐन खरीप पेरणीच्या वेळेत हवालदिल झाले आहे. या संदर्भात शेतकºयांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत बँकाना पीककर्ज देण्याबाबत सुचित करण्याची मागणी करणारे निवेदनच सादर केले आहे.ंयंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांनी उसणवारी करून घाईत पेरणी उरकली असली तरी, अद्याप ७० टक्के शेतकरी पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. बियाणे, खतांसाठी पैसा नसल्याने त्यांच्याकडून बँंकांकडे पीककर्जाची मागणीही केली आहे. यामध्ये नागपूर-मुंबई महामार्गासाठी जमीन देणाºया वनोजा येथील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. आता खरीपाच्या पेरणीसाठी बँंकांना पीककर्ज तातडीने वितरित करण्याचे आदेश असतानाही त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसीच्या कायद्यानुसार २०१६-१७ च्या कर्जाची फेड केली. त्यांना नव्याने कर्ज देणे क्रमप्राप्त असतानाही बँका वरिष्ठ स्तरावरून आदेश नसल्याचे कारण पुढे करीत शेतकºयांना वेठीस धरीत आहेत. या प्रकारामुळे वनोजा येथील शेतकरी हताश झाले असून, त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आपली समस्या जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे मांडली आहे. पीककर्ज देण्यासाठी बँकांना सुचित करावे, अशी मागणी त्यांनी केली असून, याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. या निवेदनावर वनोजा येथील ५० शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय