शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

वाशिम जिल्ह्यात रखरखत्या उन्हामुळे डाळिंब बागा सुकल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:29 IST

वाशिम: उन्हाचा पारा ४३ अशांच्यावर पोहोचला असतानाच पुरेसे पाणी नसल्यामुळे डाळिंबाच्या अनेक बागा सुकल्यात आहेत.

ठळक मुद्देकेळी, संत्रा, पपई, निंबू, डाळिंब, द्राक्ष अशा विविध फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आहे. भूजल पातळी दोन मीटरने खालावली असून, जिल्हाभरातील ६० पेक्षा अधिक धरणांतील गाळही आता सुकत चालला आहे.त्यातच उन्हाचा पाराही ४३ अंशांपेक्षा वरच असल्याने उभ्या फळबागा सुकत आहेत.

वाशिम: उन्हाचा पारा ४३ अशांच्यावर पोहोचला असतानाच पुरेसे पाणी नसल्यामुळे डाळिंबाच्या अनेक बागा सुकल्यात आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने या नुकसानीपोटी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. वाशिम जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र लक्षणीय आहे. केळी, संत्रा, पपई, निंबू, डाळिंब, द्राक्ष अशा विविध फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आहे. आर्थिक उन्नतीसाठी फळबाग लागवडीचा आधार घेणाऱ्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मात्र उन्हाचा चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पर्जन्यमानाचे प्रमाण दिवसेंदिवस खालावत आहे, तर पाण्याचा उपसा वारेमाप सुरू आहे. त्यामुळे भूजल पातळी दोन मीटरने खालावली असून, जिल्हाभरातील ६० पेक्षा अधिक धरणांतील गाळही आता सुकत चालला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच उन्हाचा पाराही ४३ अंशांपेक्षा वरच असल्याने उभ्या फळबागा सुकत आहेत. याचा सर्वाधिक फटका केळी आणि डाळिंबांच्या बागांना बसत असल्याचे दिसत असून, जिल्ह्यातील २० टक्के डाळिंबाच्या बागा उन्हामुळे सुकल्या आहेत. पुरेशा पाण्याचा अभाव आणि कडक उन्ह डाळिंबांसाठी घातक ठरते. गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाली असल्याने जमिनीत ओलावा उरला नाहीच शिवाय विहिरींनाही पुरेसे पाणी नसल्याने शेतकऱ्यांना डाळिंबांच्या बागा जगविणे कठीण झाले. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने डाळिंबांच्या बागाच वाळून जात आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील डिगांबर गिरी या शेतकºयाची पाच एकरातील डाळिंबाची बाग महिनाभरापूर्वीच सुकली, तर महेंद्र इंगोले या शेतकऱ्याची डाळिंबाची बागही उन्हामुळे पूर्णपणे सुकली आहे. अशा अनेक शेतकºयांच्या डाळिंबांना यंदा उन्हाचा फटका बसल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती