शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

नका पाहू पालकांच्या सहनशीलतेचा अंत; प्रत्यक्ष शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना करा शांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

वाशिम : जिल्ह्यातील वर्ग एक ते सातपर्यंतच्या जिल्हा परिषद तसेच इतर सर्व खासगी प्राथमिक शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ...

वाशिम : जिल्ह्यातील वर्ग एक ते सातपर्यंतच्या जिल्हा परिषद तसेच इतर सर्व खासगी प्राथमिक शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तसेच पालकांच्या सहनशीलतेचाही अंत होत असल्याचा मुद्दा समोर करीत प्राथमिक शाळा विनाविलंब सुरू कराव्यात,या मागणीसाठी जिल्हा परिषद शाळा बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी आदींना १४ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. शाळा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व इतर सर्वच खासगी प्राथमिक शाळा बंद आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने माध्यमिक वर्ग सुरू केले आहेत; मात्र इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक वर्ग सुरू केले नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील विविध गावात व शहरात असलेल्या जिल्हा परिषद शाळा ७७५ आहेत. तसेच इतर खासगी शाळांचीही संख्या मोठी आहे. या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याने तसेच गावखेड्यांमध्ये संपूर्ण जनजीवन सुरळीत सुरू असल्याने सर्वच पालकांना शाळा सुरू होऊन आपल्या मुलांना शिक्षण मिळावे असे वाटत आहे. गावखेड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना ऑनलाइन शिक्षण फार दूरची बाब आहे. त्यामुळे खेड्यातील विद्यार्थी पूर्णपणे शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जात आहे. याबाबत जिल्हा परिषद शाळा बचाव समितीच्या वतीने बऱ्याच गावातील पालकांशी चर्चा केल्या आहेत. या माध्यमातून शाळा सरसकट सुरू व्हाव्यात अशीच सर्व पालकांची मागणी आहे. त्यामुळे पालकांच्या मागणीच्या अनुषंगाने वर्ग पहिली ते सातवीच्या प्राथमिक जिल्हा परिषद शाळा तसेच इतर सर्व खासगी शाळा विनाविलंब सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. शासनाने पालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर जिल्हा परिषद शाळा बचाव समितीचे संयोजक गजानन धामणे, सामाजिक कार्यकर्ते तथा पालक गणेश नाना शिंदे, कवी साहित्यिक महेंद्र ताजने, अनिल शिंदे, प्रा. मंगेश भुताडे, संतोष आसोले, शेख इसाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

००००००

टप्प्याटप्प्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन

निवेदनाची दखल न घेतल्यास शासनाच्या विरोधात टप्प्याटप्प्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेनुसार सर्वांना शिक्षण घेण्याची समान संधी असली तरी कोरोना काळात सर्व निर्बंध शिथिल झाले असताना कोरोनाच्या आड केवळ शाळा बंद ठेवून बहुजनांना ज्ञानवंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना? असा आरोप जिल्हा परिषद शाळा बचाव समितीचे संयोजक तथा सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी केला.