शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:30 IST

आरोग्य जपण्याचा सल्ला : दूषित पाण्याने उद्भवतात पोटाचे विकार संतोष वानखडे वाशिम : पावसाळ्यात दूषित पाणी, न शिजलेले अन्न ...

आरोग्य जपण्याचा सल्ला : दूषित पाण्याने उद्भवतात पोटाचे विकार

संतोष वानखडे

वाशिम : पावसाळ्यात दूषित पाणी, न शिजलेले अन्न व रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आदींमुळे पोटाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हॉटेल उघडले तरी जिभेचे लाड नको, सकस व शक्यतो घरचेच ताजे अन्नपदार्थ सेवन करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे आहे.

पावसाळ्यात दूषित पाण्याने अनेक आजार उद्भवतात. पावसाळा सक्रिय झाला आहे. सर्वत्र दमट हवा असते. यामुळे पचनशक्ती मंदावते. त्यामुळे जड पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाहीत आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात. अनेक दिवसांनंतर आता हॉटेल्सही उघडू लागली आहेत. मात्र, पावसाळ्यात पोटाचे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसात बाहेरचे खाणे टाळायला हवे. पावसाळ्यात पचनास हलका असा आहार घेणे अपेक्षित आहे.

००००००००००००००

पावसाळ्यात हे खायला हवे...

पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. तेव्हा सकस, शुद्ध, पोषक, घरचे अन्नच खावे.

विविध प्रकारच्या भाज्या, फळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत करतात. त्यामुळे त्याचे आहारातील प्रमाण वाढवावे.

मसाल्याचे पदार्थदेखील जसे की मिरपूड, आले, हिंग, हळद, कोथिंबीर, जीर, लिंबू आदी पचनसंस्था नीट काम करण्यासाठी मदत करतात.

०००००००

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ, तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

दूषित पाण्याची समस्या असल्याने पाणीपुरी, दहीपुरी आदी चटकदार पदार्थ खाणे टाळावे.

कृत्रिम रंगाने बनविलेले पदार्थ, चायनीज पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.

कार्बनेटेड पेयांमुळे शरीरातील मिनिरल्स कमी होतात तसेच शरीराची एन्झाईम्स तयार करण्याची क्षमता मंदावते. यामुळे अपचन होऊ शकते.

००००००००००००००

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यात आरोग्याची काळजी खूप महत्त्वाची आहे. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. बॅक्टेरिया, विषाणूचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. पदार्थ बनविण्यासाठी अनेकदा शुद्ध पाणी नसते, गाळलेले किंवा उकळलेले पाणी नसते, त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांवर माशा बसून ते अन्न दूषित करतात. त्यामुळे पोटाचे विकार उद्भवत असल्याने रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.

०००००००००००००००००

कोट

पावसाळ्यात रस्त्यावरचे तसेच चटकदार पदार्थ खाणे टाळावे. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे शक्यतो हलके पदार्थ सेवन करावे. न शिजलेले अन्न तसेच दूषित पाणी अवश्य टाळावे.

- डॉ. नीलेश बढे

पोटविकारतज्ज्ञ, वाशिम

०००

कोट

पावसाळ्यात तेलकट, आंबट, तिखट तसेच उघड्यावरील पदार्थ खाणे, पालेभाज्या शक्यतो टाळाव्यात. विविध प्रकारच्या डाळी, फळांचे प्रमाण वाढवावे. पचनास हलके अन्न घ्यावे. पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी.

- डॉ. सुनीता लाहोरे

आहारतज्ज्ञ

जिल्हा सामान्य रुग्णालय