शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कोरोनाकाळात घटले डॉक्टरांचे वजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:46 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेस जिल्ह्यात साधारणत: १५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. तोपर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा केवळ ...

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेस जिल्ह्यात साधारणत: १५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. तोपर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा केवळ ७ हजार ३३९ होता; मात्र गेल्या तीन महिन्यांच्या काळात त्यात तब्बल ३० हजार ९०२ (२३ मे अखेर) नव्या रुग्णांची भर पडली आहे. १५ फेब्रुवारीला केवळ १२० ॲक्टिव्ह रुग्ण होते; तर २३ मे रोजी ही संख्या ३३५७ वर पोहोचली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. यामुळे सतत धावपळ करावी लागत असल्याने अनेक डाॅक्टरांचे वजन कमी झाले; तर काहींनी योगासन, प्राणायाम, व्यायामाव्दारे स्वत:च वजन कमी करून घेतले.

.....................

जिल्हा रुग्णालय -

डॉक्टर्सची संख्या - ३२

आरोग्य कर्मचारी - १५०

...............

कोट :

गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दुसरीकडे कोरोना चाचण्यांचेही प्रमाण वाढविण्यात आले. याशिवाय, इतरही आजारांमधील रुग्णांवर नेहमीप्रमाणे उपचार करावे लागत आहेत. परिणामी, कामाचा व्याप वाढल्याने माझ्या वजनात घट झाली आहे.

- डाॅ. मधुकर राठोड

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

............

कोरोना संसर्गाने बाधित होणाऱ्या गोरगरीब कुटुंबांतील रुग्णांना खासगी दवाखान्यांमधील खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे ते थेट शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होऊन उपचार घेत नसल्याने निश्चितपणे कामाचा व्याप वाढला आहे. दैनंदिन धावपळ करावी लागत असल्याने स्वत:च्या वजनात घट झाली आहे.

- डाॅ. अनिल कावरखे

वैद्यकीय अधिकारी, जि.सा.रु., वाशिम

..............

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांना उपचाराची दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सातत्याने धावपळ करावी लागत आहे. यादरम्यान स्वत:ला काही धोका होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे दैनंदिन योगासन, प्राणायाम आणि इतर व्यायामांव्दारे ‘फिट’ राहण्याचा प्रयत्न करत आहे.

- डाॅ. बालाजी हरण

इन्चार्ज, ट्रू नॅट लॅब, जि.सा.रु., वाशिम

.............

(बॉक्स)

आहाराची घेतात काळजी

कोरोनाच्या संकटकाळात कामाचा व्याप तुलनेने वाढलेला आहे. यामुळे ताणतणावापासून दूर राहण्यासोबतच डाॅक्टर्स मंडळी विशेषत: संतुलित आहारावर विशेष भर देत आहेत. दररोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश, मोड आलेले कडधान्य, सफरचंद, चिकू, टरबूज, खरबूज यासारख्या फळांचे सेवन नित्यनेमाने केले जात असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.