शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात घटले डॉक्टरांचे वजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:46 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेस जिल्ह्यात साधारणत: १५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. तोपर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा केवळ ...

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेस जिल्ह्यात साधारणत: १५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. तोपर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा केवळ ७ हजार ३३९ होता; मात्र गेल्या तीन महिन्यांच्या काळात त्यात तब्बल ३० हजार ९०२ (२३ मे अखेर) नव्या रुग्णांची भर पडली आहे. १५ फेब्रुवारीला केवळ १२० ॲक्टिव्ह रुग्ण होते, तर २३ मे रोजी ही संख्या ३३५७ वर पोहोचली. उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. यामुळे सतत धावपळ करावी लागत असल्याने अनेक डाॅक्टरांचे वजन कमी झाले आहे, तर काहींनी योगासन, प्राणायाम, व्यायामाद्वारे स्वत:च वजन कमी करून घेतले.

.....................

जिल्हा रुग्णालय -

डॉक्टर्सची संख्या - ३२

आरोग्य कर्मचारी - १५०

...............

कोट :

गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दुसरीकडे कोरोना चाचण्यांचेही प्रमाण वाढविण्यात आले. याशिवाय इतरही आजारांमधील रुग्णांवर नेहमीप्रमाणे उपचार करावे लागत आहेत. परिणामी, कामाचा व्याप वाढल्याने माझ्या वजनात घट झाली आहे.

- डाॅ. मधुकर राठोड

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

............

कोरोना संसर्गाने बाधित होणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना खासगी दवाखान्यांमधील खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे ते थेट शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होऊन उपचार घेत नसल्याने निश्चितपणे कामाचा व्याप वाढला आहे. दैनंदिन धावपळ करावी लागत असल्याने स्वत:च्या वजनात घट झाली आहे.

- डाॅ. अनिल कावरखे,

वैद्यकीय अधिकारी, जि.सा.रु., वाशिम

..............

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांना उपचाराची दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सातत्याने धावपळ करावी लागत आहे. यादरम्यान स्वत:ला काही धोका होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे दैनंदिन योगासन, प्राणायाम आणि इतर व्यायामांव्दारे ‘फीट’ राहण्याचा प्रयत्न करत आहे.

- डाॅ. बालाजी हरण

इन्चार्ज, ट्रू नॅट लॅब, जि.सा.रु., वाशिम

.............

(बॉक्स)

आहाराची घेतात काळजी

कोरोनाच्या संकट काळात कामाचा व्याप तुलनेने वाढलेला आहे. यामुळे ताण-तणावापासून दूर राहण्यासोबतच डाॅक्टर्स मंडळी विशेषत: संतुलित आहारावर विशेष भर देत आहेत. दररोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश, मोड आलेले कडधान्य, सफरचंद, चिकू, टरबूज, खरबूज यासारख्या फळांचे सेवन नित्य केले जात असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.