शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

जमिनी देणाऱ्या गावालाच मिळत नाही धरणाचे पाणी!

By admin | Updated: April 13, 2017 02:14 IST

बोराळा- प्रकल्पात पाणी असतानाही दरवर्षी अख्ख्या गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

पांडुरंग जटाळे - बोराळागावशिवारात लघू प्रकल्प उभा होणार असल्याने शेती सिंचनाखाली येईल, बारमाही पिके घेता येतील आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकाली निघेल, अशी आशा ठेवून प्रकल्पासाठी गावकऱ्यांनी जमिनी दिल्या; मात्र प्रकल्पात पाणी असतानाही दरवर्षी अख्ख्या गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बोराळावासीयांचे हे दुखणे कोण समजून घेणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.बोराळा येथे सन १९८९ मध्ये उभारण्यात आलेल्या लघू प्रकल्पामध्ये गावकऱ्यांनी १०० एकर जमीन दिली. त्याबदल्यात त्यांना तुटपूंजा मोबदला मिळाला. त्यामुळे गावातील अनेक शेतकरी अल्पभूधारक, भूमिहीन झाले. गावातील ७० टक्के घरे आजही कच्चा स्वरूपातील असून, पावसाळ्यात अनेकांना अतोनात त्रास सोसावा लागतो. गावाशेजारी धरण उभे होऊन २५ ते ३० वर्षांचा मोठा कालावधी उलटला; पण आजपर्यंत धरणाचे पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे गावातील एका छोट्याशा विहिरीद्वारे मिळणाऱ्या पाण्यावरच गावकऱ्यांना विसंबून राहावे लागत आहे. प्रशासनाने हा प्रश्न निकाली काढून गावात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करावी, अशी मागणी जोर धरत आहे.