शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वसतिगृहातील सुविधांसाठी शासनाकडून निधीच  मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:20 IST

गोरगरिब कुटूंबातील विद्यार्थ्यांकरिता सामाजिक  न्याय विभागाकडून चालविल्या जाणार्‍या वसतिगृहांमध्ये  अपेक्षित मुलभूत सोयी-सुविधांसाठी आवश्यक  असलेला निधीच गेल्या दीड ते दोन वर्षांपासून  मिळालेला नाही, अशी स्पष्टोक्ती वाशिम येथील  सामाजिक न्याय विभागाच्या सहायक उपायुक्त माया  केदार यांनी दिली. यामुळे मात्र उद्भवलेल्या  असुविधांमुळे विद्यार्थी वैतागले असून वसतिगृहांचा मूळ  उद्देशच भरकटत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देसहायक उपायुक्तांची स्पष्टोक्ती असुविधांमुळे विद्यार्थी वैतागले!

सुनील काकडे। लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गोरगरिब कुटूंबातील विद्यार्थ्यांकरिता सामाजिक  न्याय विभागाकडून चालविल्या जाणार्‍या वसतिगृहांमध्ये  अपेक्षित मुलभूत सोयी-सुविधांसाठी आवश्यक  असलेला निधीच गेल्या दीड ते दोन वर्षांपासून  मिळालेला नाही, अशी स्पष्टोक्ती वाशिम येथील  सामाजिक न्याय विभागाच्या सहायक उपायुक्त माया  केदार यांनी दिली. यामुळे मात्र उद्भवलेल्या  असुविधांमुळे विद्यार्थी वैतागले असून वसतिगृहांचा मूळ  उद्देशच भरकटत असल्याचे दिसून येत आहे. वाशिम येथील शासकीय बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्रात  वास्तव्याला असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मुलभूत  सुविधा पुरविण्याकामी प्रशासन सपशेल अपयशी ठरले  आहे. हात, पाय यासह इतर शारिरीक व्याधींनी त्रस्त  असतानाही जीवन जगण्याची धडपड करणार्‍या या  विद्यार्थ्यांना गाळ साचलेल्या सिमेंटच्या टाक्यात  साठविल्या जाणारे विहिरीचे अशुद्ध पाणी प्यावे लागत  असून  वसतिगृहात साधे ‘वॉटर फिल्टर’ अद्याप  लावण्यात आलेले नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांना  शौचालयांअभावी पायर्‍या उतरून बाहेर उघड्यावर  शौचास जावे लागते, झोपण्याकरिता असलेल्या पलंगांची  मोडतोड झाली असून गाद्या प्रचंड प्रमाणात मळालेल्या  आहेत. हा सर्व गंभीर प्रकार ‘लोकमत’ने ३ सप्टेंबर रोजी  ‘स्टिंग ऑपरेशन’च्या माध्यमातून उजागर केला.दरम्यान, यासंदर्भात वाशिम येथील सामाजिक न्याय  विभागाच्या सहायक उपायुक्त केदार यांच्याशी चर्चा  केली असता, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून वस ितगृहांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी लागणारा निधीच  शासनाकडून प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.  यासंदर्भातील प्रस्ताव वेळावेळी शासनाकडे सादर  करण्यात आले आहेत; परंतू त्यावर अद्याप कुठलाच  निर्णय झाला नसल्याचेही त्या म्हणाल्या. असे असले तरी  पिण्याच्या पाण्यात पाणी निर्जंतूकीकरणाचे द्रावण  टाकण्याच्या सूचना वसतिगृह अधिक्षकांना देण्यात  आल्या असून वसतिगृहामध्ये शौचालय उभारण्याची  बाबही प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी यावेळी  दिली.