शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १९९ विहिरींचे होणार अधिग्रहण !

By admin | Updated: April 10, 2017 01:37 IST

वाशिम: संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे.

वाशिम: संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता त्या-त्या गावात विहीर अधिग्रहण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांनी दिली.यावर्षी जिल्ह्यातील २६६ गावांत पाणीटंचाई जाणवणार असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कृती आराखड्यातील उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. सुरूवातीला तीव्र पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांमध्ये, जलसाठा असलेल्या विहिरींचे अधिग्रहण करून गावकऱ्यांना पाणी पुरविले जाणार आहे. वाशिम तालुक्यातील ३५ गावांत ३५ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. याप्रमाणे मालेगाव तालुक्यात ४० गावांमध्ये ४० विहीर अधिग्रहण, रिसोड तालुक्यात ४० गावांत ४० विहीर अधिग्रहण, मंगरूळपीर तालुक्यात २२ गावांत २२ विहीर अधिग्रहण, मानोरा तालुक्यात २५ गावांत २५ आणि कारंजा तालुक्यात ३७ गावांत ३७ अशा एकूण १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांत विहीर अधिग्रहण करण्याची कार्यवाही सुरू झाली.