शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

इंझोरीत प्रकल्पग्रस्तांचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:41 IST

इंझोरी येथील संत गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात जिल्हाभरातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या ...

इंझोरी येथील संत गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात जिल्हाभरातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मेळाव्यात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण, समितीचे सहाय्यक मार्गदर्शक रवींद्र जैन, सहसचिव सचिन ढवळे यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्क व अधिकाराबाबत मोलाचे मार्गदर्शन करुन प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक व धोरणात्मक मागण्यांसाठी संघर्षाचा लढा तीव्र करण्याचे आवाहन केले. संपूर्ण विदर्भात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने प्रकल्पग्रस्तांना संघटीत करण्याचे अभियान सुरू केले असून, यात नोंदणीसाठी प्रकल्पग्रस्तांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयीनस्तरावर सकारात्मक चर्चा सुरू असून, निर्णय न झाल्यास मागण्या पूर्णत्त्वास नेण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी समितीकडून देण्यात आला. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समितीचे जिल्हा पदाधिकारी मो. रियाज शेख, गणेश नायसे, धम्मानंद आग्नेय, संजय इंगोले, कैलास आदिंनी परिश्रम घेतले.

------------------

विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा

इंझोरी येथे आयोजित मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यात १८९४ चा भूसंपादन कायदा अस्तित्त्वात असतानाही जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सरकारने ६ जून २००६ला एक परिपत्रक काढून सरळ खरेदी पद्धतीने ९० हजार ते २.५ लाखापर्यंतच्या कवडीमोल दराने आणि आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात खरेदी करून घेत शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. प्रकल्पग्रस्तांसाठी कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कायदेशीररित्या ५ टक्के आरक्षण असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्त हक्काच्या लाभापासून वंचित आहेत. यातील ७० टक्के प्रमाणपत्रधारक वयोमर्यादेतून बाद झाले असून, उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली जमीन सरकारने घेतल्यामुळे ते अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.

------------------

शासनाकडे करणार या मागण्या

प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात शासनाकडे विविध मागण्या मांडण्याचे ठरविण्यात आले. त्यात सर्वसमावेशक प्रकल्पग्रस्तांसाठी असलेले आरक्षण ५ टक्क्यांवरून १५ टक्के करून, त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, २००० ते २०१३ या कालावधीदरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना २०१३च्या कायद्यातील तरतुदीनुसार वाढीव मोबदला देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.