शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

इंझोरीत प्रकल्पग्रस्तांचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:41 IST

इंझोरी येथील संत गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात जिल्हाभरातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या ...

इंझोरी येथील संत गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात जिल्हाभरातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मेळाव्यात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण, समितीचे सहाय्यक मार्गदर्शक रवींद्र जैन, सहसचिव सचिन ढवळे यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्क व अधिकाराबाबत मोलाचे मार्गदर्शन करुन प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक व धोरणात्मक मागण्यांसाठी संघर्षाचा लढा तीव्र करण्याचे आवाहन केले. संपूर्ण विदर्भात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने प्रकल्पग्रस्तांना संघटीत करण्याचे अभियान सुरू केले असून, यात नोंदणीसाठी प्रकल्पग्रस्तांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयीनस्तरावर सकारात्मक चर्चा सुरू असून, निर्णय न झाल्यास मागण्या पूर्णत्त्वास नेण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी समितीकडून देण्यात आला. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समितीचे जिल्हा पदाधिकारी मो. रियाज शेख, गणेश नायसे, धम्मानंद आग्नेय, संजय इंगोले, कैलास आदिंनी परिश्रम घेतले.

------------------

विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा

इंझोरी येथे आयोजित मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यात १८९४ चा भूसंपादन कायदा अस्तित्त्वात असतानाही जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सरकारने ६ जून २००६ला एक परिपत्रक काढून सरळ खरेदी पद्धतीने ९० हजार ते २.५ लाखापर्यंतच्या कवडीमोल दराने आणि आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात खरेदी करून घेत शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. प्रकल्पग्रस्तांसाठी कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कायदेशीररित्या ५ टक्के आरक्षण असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्त हक्काच्या लाभापासून वंचित आहेत. यातील ७० टक्के प्रमाणपत्रधारक वयोमर्यादेतून बाद झाले असून, उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली जमीन सरकारने घेतल्यामुळे ते अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.

------------------

शासनाकडे करणार या मागण्या

प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात शासनाकडे विविध मागण्या मांडण्याचे ठरविण्यात आले. त्यात सर्वसमावेशक प्रकल्पग्रस्तांसाठी असलेले आरक्षण ५ टक्क्यांवरून १५ टक्के करून, त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, २००० ते २०१३ या कालावधीदरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना २०१३च्या कायद्यातील तरतुदीनुसार वाढीव मोबदला देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.