शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा!

By admin | Updated: January 4, 2016 02:35 IST

वाशिम जि.प. कृषी समितीचा शासनाकडे ठराव.

वाशिम: अंतिम पैसेवारी सरासरी ४४ पैसे जाहीर झालेली असतानाही वाशिम जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले नाही. या पृष्ठभूमीवर शासनाने जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे, दुष्काळ मदतनिधीचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्राधान्यक्रमाने लाभ द्यावा, अशा आशयाचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीने शनिवारी पारित करून शासनाकडे सादर केला जाणार आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने २९ डिसेंबरला ३0५0 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले; मात्र या पॅकेजचा जिल्ह्याला फारसा लाभ होणार नसल्याने शेतकर्‍यांना भरीव मदत निधीची गरज आहे. यावर्षी पाऊस फितुर झाल्याने शेतकर्‍यांचे बजेट कोलमडले. भावी संकटाच्या भीतीने काही शेतकरी मृत्यूला जवळ करीत आहेत, तर काही शेतकरी या संकटातून स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नात आहेत. जिल्ह्याची सुधारित व अंतिम पैसेवारी ५0 च्या आत असतानाही, शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केलेला नाही. २९ डिसेंबरला केंद्र सरकारने महाराष्ट्राला ३0५0 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला; मात्र पहिल्या टप्प्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त होती. त्यामुळे या पॅकेजचा वाशिम जिल्ह्याला फारसा लाभ मिळणार नाही. शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केल्यास विशेष पॅकेज व अन्य सुविधांचा शेतकरी व शेतकरीपुत्रास लाभ होईल, यावर कृषी विषय समितीच्या सभेत चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुभाष शिंदे यांच्या दालनात २ जानेवारीला पार पडलेल्या या सभेला कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर, जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर, श्याम बढे, उषा अनिल जाधव, हरिदास कोरडे यांच्यासह समिती सदस्य, तालुका कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.