शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा शल्य ...

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आर. जे. तायडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता खान या आढावा बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील ज्या गावांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे, त्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे नियोजन तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी यांच्या समन्वयातून आवश्यक त्या उपाययोजना करून करावे. विशेषतः मालेगाव तालुक्यातील ज्या गावांना संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे, त्या गावांना तहसीलदार यांनी भेट द्यावी. प्रस्तावाची वाट न पाहता उपाययोजना कराव्यात. लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या गावांव्यतिरिक्त ज्या गावांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे, त्या गावांना पाणी पुरवठ्याबाबतचे नियोजन करावे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये आवश्यक तेवढा ब्लिचिंगचा साठा उपलब्ध असावा, असे सांगून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, पिण्याचे पाणी दूषित होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शाम सवाई, दीपक सदाफळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तसेच संबंधित अधिकारी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

०००

इमारती व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

जिल्ह्यातील धोकादायक असलेल्या शाळा, आरोग्य विभागाच्या इमारती व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाने करावे. पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या वादळाने व अतिवृष्टीने जी झाडे पडण्याची शक्यता आहे, त्याचा शोध महावितरण कंपनीने घ्यावा. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही, यादृष्टीने महावितरण कंपनीने पूर्वतयारी करावी. तसेच त्यांची पथके तैनात ठेवावीत. वीज पडून प्राणहानी होऊ नये यासाठी ग्रामस्थांना सतर्क करावे. स्वयंसेवकांच्या याद्या तयार कराव्यात. साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी ग्रामपंचायती, नगरपंचायती आणि नगरपालिकांनी दक्षता घेऊन पूर्वतयारी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

००००

ग्रामसेवकांनी मुख्यालय सोडू नये

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी पावसाळ्याच्या दिवसात आपले मुख्यालय सोडू नये. संबंधित गावाच्या काही अडचणी असतील तर गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या. पावसाळ्याच्या दिवसात गर्भवती महिला व स्तनदा मातांची काळजी घ्यावी. विशेषतः ज्या गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात ये-जा करण्यास अडचण होते, अशा गावातील या महिलांची काळजी घ्यावी.

०००००