शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा शल्य ...

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आर. जे. तायडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता खान या आढावा बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील ज्या गावांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे, त्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे नियोजन तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी यांच्या समन्वयातून आवश्यक त्या उपाययोजना करून करावे. विशेषतः मालेगाव तालुक्यातील ज्या गावांना संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे, त्या गावांना तहसीलदार यांनी भेट द्यावी. प्रस्तावाची वाट न पाहता उपाययोजना कराव्यात. लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या गावांव्यतिरिक्त ज्या गावांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे, त्या गावांना पाणी पुरवठ्याबाबतचे नियोजन करावे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये आवश्यक तेवढा ब्लिचिंगचा साठा उपलब्ध असावा, असे सांगून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, पिण्याचे पाणी दूषित होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शाम सवाई, दीपक सदाफळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तसेच संबंधित अधिकारी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

०००

इमारती व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

जिल्ह्यातील धोकादायक असलेल्या शाळा, आरोग्य विभागाच्या इमारती व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाने करावे. पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या वादळाने व अतिवृष्टीने जी झाडे पडण्याची शक्यता आहे, त्याचा शोध महावितरण कंपनीने घ्यावा. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही, यादृष्टीने महावितरण कंपनीने पूर्वतयारी करावी. तसेच त्यांची पथके तैनात ठेवावीत. वीज पडून प्राणहानी होऊ नये यासाठी ग्रामस्थांना सतर्क करावे. स्वयंसेवकांच्या याद्या तयार कराव्यात. साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी ग्रामपंचायती, नगरपंचायती आणि नगरपालिकांनी दक्षता घेऊन पूर्वतयारी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

००००

ग्रामसेवकांनी मुख्यालय सोडू नये

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी पावसाळ्याच्या दिवसात आपले मुख्यालय सोडू नये. संबंधित गावाच्या काही अडचणी असतील तर गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या. पावसाळ्याच्या दिवसात गर्भवती महिला व स्तनदा मातांची काळजी घ्यावी. विशेषतः ज्या गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात ये-जा करण्यास अडचण होते, अशा गावातील या महिलांची काळजी घ्यावी.

०००००