शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सवाबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:11 IST

वाशिम : गणेशोत्सव साजरा करताना यावर्षी सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मातीपासून बनविण्यात आलेल्या कमी उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. गणेशोत्सव व बकरी ईदनिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देकमी उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन गणेशोत्सव व बकरी ईदनिमित्त आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गणेशोत्सव साजरा करताना यावर्षी सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मातीपासून बनविण्यात आलेल्या कमी उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. गणेशोत्सव व बकरी ईदनिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, उपविभागीय महसूल अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपाधीक्षक घुगे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांचे प्रभारी, शांतता समितीचे सदस्य व गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविण्यात आलेल्या जास्त उंचीच्या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर पीओपी पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही.  यंदा आतापर्यंत अतिशय कमी पाऊस झाल्याने शहरातील तलावांमध्ये अतिशय कमी पाणीसाठा आहे. त्यासाठी कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन मातीपासून बनलेल्या कमी उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याबाबत निर्णय घ्यावा अथवा जास्त उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यास तिचे विसर्जन न करता केवळ छोट्या आकाराच्या स्थापना मूर्तीचे  विसर्जन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केले.