शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी वाढली पोलिसांची डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:00 IST

ली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी देखील वाढली आहे.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यापुर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन ७६ पैकी ६० मुलींचा शोध लागला असला तरी १६ मुली नेमक्या कुठे आहेत, याचा थांगपत्ता लागेना. अशातच १४ फेब्रूवारी रोजी शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील जांब अढाव येथून एक मुलगी बेपत्ता झाली. तथापि, मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी देखील वाढली आहे.सन २०१९ मध्ये जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ६२ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. त्यातील ४९ मुलींचा शोध लागला; मात्र राज्यभरातील अनेक जिल्हे पिंजून काढल्यानंतरही पोलिसांना १३ मुलींचा आजतागायत थांगपत्ता लागलेला नाही. असे असताना जानेवारी २०२० या एकाच महिन्यात तब्बल १४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिस प्रशासनाने तातडीची पावले उचलत तथा तपासचक्र गतीने फिरवून ११ मुलींचा शोध घेतला; मात्र ३ मुली आजही बेपत्ताच आहेत.विशेष बाब म्हणजे वाशिम शहरातून १९ फेब्रूवारीला बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचे प्रकरण थेट गृहमंत्र्यांपर्यंत पोहचले. वाशिम जिल्हा पोलिस दलाने याप्रकरणी मुलीचे नातेवाईक, मित्र-मैत्रीणींकडे सातत्याने चौकशी केली. अनेक ठिकाणचे सीसी फुटेजही तपासण्यात आले; मात्र त्याचा कुठलाच फायदा झालेला नाही. याच प्रकरणी पोलिसांनी तपासकार्याला अधिक गती द्यावी, अशी मागणी पुढे रेटत वाशिममध्ये ७ फेब्रूवारीला भव्य स्वरूपात जनआक्रोश मोर्चा देखील निघाला होता, हे विशेष. असे असताना सदर मुलीचा आजपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही.

सरपंच संघटनेचा मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहारवाशिम शहरातून १९ जानेवारीला बेपत्ता झालेल्या मुलीसह इतरही अनेक अल्पवयीन मुलींचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही. घडलेल्या सर्वच प्रकरणांचा तातडीने छडा लावावा, अशा आशयाचे पत्र वाशिम जिल्हा सरपंच संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहे.

मुला-मुलींच्या समुपदेशनासाठी प्रशासन घेणार पुढाकारजिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहे. संबंधित मुलींचा शोध घेण्याचा सर्वंकष प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्हा प्रशासनही शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींच्या समुपदेशनासाठी पुढाकार घेणार असून जिल्ह्यातील पालकांनीही त्यास सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे मत वाशिमचे जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासनाचे सर्वच पातळीवर युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तांत्रीक बाबी तपासण्याची जबाबदारी ‘सायबर सेल’कडे सोपविण्यात आली असून प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘मिसींग सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. पोलिस आपले काम इमानेइतबारे करित आहे, पालकांनी देखील आपल्या अल्पवयीन मुलामुलींच्या प्रत्येक हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवायला हवे.- वसंत परदेशीजिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं