शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मंगरुळपीर पंचायत समितीच्या आवारात नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:09 IST

मंगरुळपीर: येथील पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त दरदिवशी शेकडो नागरिक येत असतात. या नागरिकांना अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे प्रतिक्षा करणे क्रमप्राप्त ठरते; परंतु या प्रतिक्षेच्या वेळेत त्यांना सुखरूप थांबण्यासाठी सुविधाच उपलब्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: येथील पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त दरदिवशी शेकडो नागरिक येत असतात. या नागरिकांना अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे प्रतिक्षा करणे क्रमप्राप्त ठरते; परंतु या प्रतिक्षेच्या वेळेत त्यांना सुखरूप थांबण्यासाठी सुविधाच उपलब्ध नाही. पावसाळ्याच्या दिवसांत त्यामुळे नागरिकांची मोठी त्रेधा तिरपिट उडत असल्याचे चित्र पाहायला मिळते.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम १०८मध्ये पंचायत समितीच्या कार्याचे वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये शेतीविषयक सुधारणांच्या योजनांची अंमलबजावणी करणे, सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे, प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे, पाझर तलावांच्या कामांना गती देणे, जलसिंचनाच्या सोयी करणे,      पशुधनाचा विकास करणे, गावागावांना जोडणाºया रस्त्यांची दुरूस्ती करणे, हस्त कलाद्योग व कुटीरउद्योगांना प्रोत्साहन देणे, समाजकल्याणच्या विविध योजना राबवणे आदिंचा समावेश आहे. अर्थातच या कामांशी संबंधित ग्रामीण भागांतील शेकडो लोक पंचायत समिती कार्यालयात दरदिवशी येत असतात. त्यामुळे येथे येणाºयांची संख्या लक्षणीय असते. येथे येणाºया प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधून त्याचे समाधान करणे अधिकारी, कर्मचाºयांचे कर्तव्य असते; परंतु एकाच वेळी अनेकांसोबत संवाद साधणे शक्य नसल्याने अनेक ग्रामस्थांना प्रतिक्षा करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन येथे येणाºया ग्रामस्थांना प्रतिक्षेत थांबण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे; परंतु मंगरुळपीर येथील पंचायत समिती कार्यालयात, अशी सुविधा नाही. त्यातच कार्यालयातील कक्षांची व्याप्ती मर्यादित असल्याने येथे येणाºया लोकांना बाहेर ताटकळत उभे राहावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांत पाऊस पडत असल्यास या लोकांची मोठी त्रेधा तिरपिट उडते.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरNagar Bhavanनगरभवन