शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मंगरुळपीर पंचायत समितीच्या आवारात नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:09 IST

मंगरुळपीर: येथील पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त दरदिवशी शेकडो नागरिक येत असतात. या नागरिकांना अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे प्रतिक्षा करणे क्रमप्राप्त ठरते; परंतु या प्रतिक्षेच्या वेळेत त्यांना सुखरूप थांबण्यासाठी सुविधाच उपलब्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: येथील पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त दरदिवशी शेकडो नागरिक येत असतात. या नागरिकांना अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे प्रतिक्षा करणे क्रमप्राप्त ठरते; परंतु या प्रतिक्षेच्या वेळेत त्यांना सुखरूप थांबण्यासाठी सुविधाच उपलब्ध नाही. पावसाळ्याच्या दिवसांत त्यामुळे नागरिकांची मोठी त्रेधा तिरपिट उडत असल्याचे चित्र पाहायला मिळते.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम १०८मध्ये पंचायत समितीच्या कार्याचे वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये शेतीविषयक सुधारणांच्या योजनांची अंमलबजावणी करणे, सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे, प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे, पाझर तलावांच्या कामांना गती देणे, जलसिंचनाच्या सोयी करणे,      पशुधनाचा विकास करणे, गावागावांना जोडणाºया रस्त्यांची दुरूस्ती करणे, हस्त कलाद्योग व कुटीरउद्योगांना प्रोत्साहन देणे, समाजकल्याणच्या विविध योजना राबवणे आदिंचा समावेश आहे. अर्थातच या कामांशी संबंधित ग्रामीण भागांतील शेकडो लोक पंचायत समिती कार्यालयात दरदिवशी येत असतात. त्यामुळे येथे येणाºयांची संख्या लक्षणीय असते. येथे येणाºया प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधून त्याचे समाधान करणे अधिकारी, कर्मचाºयांचे कर्तव्य असते; परंतु एकाच वेळी अनेकांसोबत संवाद साधणे शक्य नसल्याने अनेक ग्रामस्थांना प्रतिक्षा करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन येथे येणाºया ग्रामस्थांना प्रतिक्षेत थांबण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे; परंतु मंगरुळपीर येथील पंचायत समिती कार्यालयात, अशी सुविधा नाही. त्यातच कार्यालयातील कक्षांची व्याप्ती मर्यादित असल्याने येथे येणाºया लोकांना बाहेर ताटकळत उभे राहावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांत पाऊस पडत असल्यास या लोकांची मोठी त्रेधा तिरपिट उडते.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरNagar Bhavanनगरभवन