शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शाळा बंद निर्णयाविरोधात धरणे आंदोलन

By संतोष वानखडे | Updated: October 19, 2022 18:31 IST

Education News: पटसंख्येच्या कारणावरून कोणतीही शाळा बंद करू नये या मागणीसाठी शाळा बचाव समितीसह शिक्षक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी १९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले

- संतोष वाखनडेवाशिम - पटसंख्येच्या कारणावरून कोणतीही शाळा बंद करू नये या मागणीसाठी शाळा बचाव समितीसह शिक्षक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी १९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.

राज्य सरकारने जनतेवर ज्ञानबंदी लादण्यासाठी जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा कुटिल डाव आखला जात आहे, असा आरोप करीत हा डाव उधळून लावण्यासाठी धरणे आंदोलन केल्याचे यावेळी शाळा बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांची माहिती शासनाने मागविल्याने या शाळा बंद होण्याची भीती वर्तविली जात आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा या आदिवासी पाडे, दुर्गम भागातील मुला -मुलींच्या शिक्षणासाठी सुरू आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे त्या शाळा बंद झाल्यास मुले शाळाबाह्य होण्याची भीती आहे. शिक्षण हे मूलभूत गरजांमध्ये येत असल्यामुळे शासन याबाबतीत असा निकष कसा काय लावू शकते ? असा प्रश्न उपस्थित करीत पटसंख्येच्या कारणावरून कोणतीही शाळा बंद करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शाळा आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची, सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारचा निषेध, शाळा वाचवा-शिक्षण वाचवा, अश्या विविध घोषणा देवून शाळा वाचविन्याचा आवाज बुलंद करण्यात आला. या आंदोलनात बंद होणार्या शाळांचे सुरकंडी बू. ,मसला बू., झोडगा बु. एकलासपुर , सरपखेड व ईतर काही शाळांचे विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.