शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

यात्रा रद्द झाल्याने भाविकांनी पोहरादेवी येथे येवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:39 IST

वाशिम : पोहरादेवी येथे दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा, ...

वाशिम : पोहरादेवी येथे दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा, २१ एप्रिल रोजी होणारी पोहरादेवी येथील यात्रा रद्द करण्याचा निर्णय पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथील महंत, विश्वस्त आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी यावर्षी पोहरादेवी येथे न येता आपल्या घरीच विधी, पूजा करून संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले आहे. १२ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत असून शासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. एकाच ठिकाणी गर्दी झाल्यास कोरोनाचा अधिक फैलाव होत असल्याने सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंदिरातही भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोहरादेवी येथे २१ एप्रिल रोजी होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज व महंत सुनील महाराज यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथील धर्मगुरू, महंत यांनी पोहरादेवी येथे भाविकांनी येवू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे भाविकांनी पोहरादेवी येथे न येता घरीच राहून विधी, पूजा करावी.

पोहरादेवी येथील यात्रा रद्द झाली असून मंदिरामध्ये भाविकांना दर्शनसाठी प्रवेश दिला जाणार नाही. गावामध्ये पूर्णतः संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याने कोणालाही पोहरादेवी परिसरात वाहनाने अथवा पायी प्रवेश देण्यात येणार नाही. पोहरादेवीच्या सर्व सीमा बंद करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी पोहरादेवी येथे न येता, घरी राहूनच संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक परदेशी यांनी केले आहे.

मिरवणूक, रॅली काढण्यास मनाई

जिल्ह्यात सध्या संचारबंदी आदेश लागू असून गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, रमजान ईद हे सण, उत्सव साजरे करताना मिरवणूक, रॅली काढण्यास किंवा गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई राहणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थिती ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले.