शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

यात्रा रद्द झाल्याने भाविकांनी पोहरादेवी येथे येवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:39 IST

वाशिम : पोहरादेवी येथे दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा, ...

वाशिम : पोहरादेवी येथे दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा, २१ एप्रिल रोजी होणारी पोहरादेवी येथील यात्रा रद्द करण्याचा निर्णय पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथील महंत, विश्वस्त आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी यावर्षी पोहरादेवी येथे न येता आपल्या घरीच विधी, पूजा करून संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले आहे. १२ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत असून शासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. एकाच ठिकाणी गर्दी झाल्यास कोरोनाचा अधिक फैलाव होत असल्याने सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंदिरातही भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोहरादेवी येथे २१ एप्रिल रोजी होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज व महंत सुनील महाराज यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथील धर्मगुरू, महंत यांनी पोहरादेवी येथे भाविकांनी येवू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे भाविकांनी पोहरादेवी येथे न येता घरीच राहून विधी, पूजा करावी.

पोहरादेवी येथील यात्रा रद्द झाली असून मंदिरामध्ये भाविकांना दर्शनसाठी प्रवेश दिला जाणार नाही. गावामध्ये पूर्णतः संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याने कोणालाही पोहरादेवी परिसरात वाहनाने अथवा पायी प्रवेश देण्यात येणार नाही. पोहरादेवीच्या सर्व सीमा बंद करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी पोहरादेवी येथे न येता, घरी राहूनच संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक परदेशी यांनी केले आहे.

मिरवणूक, रॅली काढण्यास मनाई

जिल्ह्यात सध्या संचारबंदी आदेश लागू असून गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, रमजान ईद हे सण, उत्सव साजरे करताना मिरवणूक, रॅली काढण्यास किंवा गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई राहणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थिती ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले.