शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वाकद येथे विकास कामे ठप्प; ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 15:09 IST

गावातील अतिक्रमण, ठप्प असलेली विकास कामे आदींना कंटाळून तालुक्यातील वाकद येथील ग्रामस्थांनी १७ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

रिसोड (वाशिम) : गावातील अतिक्रमण, ठप्प असलेली विकास कामे आदींना कंटाळून तालुक्यातील वाकद येथील ग्रामस्थांनी १७ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी ग्राम पंचायत प्रशासनाच्या दिरंगाई धोरणाबद्दल रोष व्यक्त केला. वाकद ग्रामपंचायतने महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधले होते. परंतू या शौचालयाच्या बाजूला कुणीतरी अतिक्रमण करून शौचालयाकडे जाण्यासाठी रस्ताच ठेवला नाही. यासंदर्भात महिलांसह ग्रामस्थांनी अनेकवेळा ही बाब ग्राम पंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिली. मात्र, याकडे ग्राम पंचायतने लक्ष दिले नाही. याशिवाय गावातील विकास कामे ठप्प आहेत असा आरोप करीत गावक-यांनी १७ जानेवारीला ग्राम पंचायत कार्यालयाला कुलुप ठोकले.  जोपर्यंत प्रलंबित प्रश्न सोडविले जात नाहीत, तोपर्यत आम्ही  ग्राम पंचायत कार्यालय उघडू देणार नाही, अशी भूमिका महिलांसह ग्रामस्थांनी घेतली होती. शेवटी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी येवुन महिलांची तसेच ग्रामस्थांची समजुत काढत सदर अतिक्रमण तातडीने काढले जाईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे कुलूप ठोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन मागे घेतल्यानंतर ग्राम पंचायत प्रशासनाने घटनास्थळावर जावून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली.

टॅग्स :washimवाशिम