शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

शिरपूरचा विकास खुंटला, लोकप्रतिनिधींची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST

गावातील मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. सांडपाण्याच्या नाल्या अरूंद असल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहून समस्या अधिकच गंभीर झाली ...

गावातील मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. सांडपाण्याच्या नाल्या अरूंद असल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहून समस्या अधिकच गंभीर झाली आहे. गावाला मागील दोन वर्षांपूर्वी ‘ब’ श्रेणीतील पर्यटनक्षेत्राचा दर्जा मिळाला. गावाची लोकसंख्या २० हजारांहून अधिक आहे तसेच गावांचा विस्तारही फार मोठ्या प्रमाणात आहे. साहजिकच विकासकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. सध्याच्या घडीला गावातील सर्वच मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. जानगीर महाराज संस्थानकडे जाणारा रस्ता, जगप्रसिद्ध जैन मंदिराकडे जाणारा रस्ता, हजरत मिर्झा बाबा दर्गा तथा जगदंबा देवी संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यासह वाॅर्ड नंबर ५, वॉर्ड नंबर ६ मधील रस्त्यांची दैना झालेली आहे. गावातील सांडपाण्याच्या नाल्या अतिशय अरुंद झाल्याने तसेच काही ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणी भरणे झाल्यानंतर नागरिकांकडून रस्त्यावर सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे प्रश्न बिकट झाला आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये मो.ईमदाद बागवान यांनी दाखल केलेली जनहित याचिका निकाली काढताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिरपूर गावातील अतिक्रमण हटवून विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनासह स्थानिक ग्रामपंचायतला दिले होते. यावेळी प्रशासनाने काही रस्त्यावरचे अतिक्रमण हटविले; मात्र, ते आता पूर्ववत झाले आहे. गावात देशभरातून येणाऱ्या भाविकांची व गावकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.

..................

विकास आराखडा गुलदस्त्यात

शिरपुरातील अतिक्रमण हटवून विकासकामे करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. प्रशासनाने त्यावर कार्य करण्यास प्रारंभही केला; परंतु पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे विकास आराखडा तयार करण्यात आला की नाही ही बाब गुलदस्त्यात आहे.

....................

कोट:

जैनांची काशी, पर्यटन क्षेत्राचा दर्जा असलेल्या शिरपुरातील मुख्य रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची दुरावस्था झाली आहे. गावाच्या विकासाकरिता अधिक निधी उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे.

- किशोर देशमुख, शिरपूर जैन

.................

कोट:

गावाचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे विविध स्वरूपातील विकासकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. कामे मंजूर झाल्यानंतर ती वेगाने करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन निश्चितपणे पुढाकार घेईन. वाॅर्ड नंबर सहामधील रस्त्याचे १५ व्या वित्त आयोगातून काम सुरू करण्यात आले आहे.

-भागवत भुरकाडे,

ग्रामविकास अधिकारी, शिरपूर