शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
7
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
8
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
9
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
10
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
11
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
12
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
13
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
14
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
15
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
16
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
17
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
19
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
20
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स

वाट चुकलेल्या ‘पुष्पा’साठी दिव्यांग ‘चाँद’ ठरला देवदुत!

By admin | Updated: July 9, 2017 09:42 IST

पंढरीच्या वारीत हरवलेल्या महिलेला मदत

यशवंत हिवराळे । लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (जि.वाशिम) : विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुर वारीत गेलेल्या पुष्पाबाईची वाट हरवली. त्यानंतर सतत तीन दिवस उपाशी पोटी वणवण भटकंती करावी लागली; मात्र औरंगाबाद येथे दिव्यांग शेख करीमच्या रुपाने साक्षात देवदूत भेटल्याने त्या सुखरुप घरी पोहोचलेल्या.मालेगाव तालुक्यातील मौजे राजुरा येथील पुष्पाबाई बळीराम सानप ही (४५) २ जुलै रोजी एका खासगी ट्रॅव्हल्सने पंढरपुर वारीसाठी गेली हो ती. मात्र पंढरपुरात पुष्पाबाईची लाखोंच्या गर्दीत संवगड्यासोबत ३ जुलै रोजी चुकाभूल झाली. दिवसभर पंढरीत संवगड्याचा शोध घेणार्‍या पुष् पाबाईच्या पदरी निराशा पडली. सर्वच परिसर अपरिचित असल्यामुळे शेवटी त्यांनी बसस्थानकाचा आधार शोधला. तेथून त्या नगरला पोहोचल्या. नगरच्या बसस्थानकावर रात्र काढलेल्या पुष्पाबाईला प्रवाशांनी औरंगाबादला जाण्याचा सल्ला दिला. त्या औरंगाबादला आल्या तो पर्यंंत जवळचा पैसा संपला होता. खीन्नवस्थेत उभ्या असलेल्या पुष्पाबाईची काही प्रवाशांनी विचारपुस केली असता पुष् पाबाईनी आपबिती कथन करुन मालेगावला जायचे असे सागताच प्रवाशांनी एका बसमध्ये बसवून दिले. बस मार्गस्थ झाली. औरंगाबाद श्हरापासून काही किमी अंतरावर पोहोचली असता बस वाहकाने तिकीटाची विचारणा करताच मला वाशिम -मालेगावला जायचं असे सांगितले. मात्र पुष्पाबाईचे दुदैव येथे आड आली ती बस वाशिम मालेगाव नसून धुळे-मालेगाव असल्याचे वाहकाने सांगून एका पेट्रोल पंपावर पुष्पाबाईना उतरवुन दिले. असंख्य प्रश्नाचे काहूर डोक्यात घुसलेल्या पुष्पाबाई मोठमोठय़ाने रडायला लागल्या. त्याच क्षणी रोजी रोटीच्या शोधात गवंडी कामावर जात असलेल्या व एका हाताने दिव्यांग असलेल्या पेडगाव जि.औरंगाबाद येथील शेख चाँद शेख करीम वय ५0 वर्षे या मुस्लीम युवकाचे पुष्पाबाईची आपबिती ऐकुण हृदय हेलावले. आस्थेने त्यांनी पुष्पाबाईची विचारपुस केली. चांदभाईनी औरंगाबाद बसस्थानकाची पुष्पाबाईला घेवुन वाट धरली. औरंगाबाद वाशिम बसमध्ये मालेगावकडे येत असतानाआणखी एका संकटाला पुष्पाबाईंना सामोर जावे लागलं. रस्त्यावरुन धावणार्‍या एका सायकल स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा अपघात झाला. यामध्ये काही प्रवाशी जखमी होऊन पुष्पाबाईच्या डोक्याला मार लागला. वाटेत दवाखाना करुन बस मार्गस्थ झाली. गुरुवार ६ जुलै रोजी रात्री सायंकाळदरम्यान शे.चांदभाई पुष्पाबाईंना घेऊन राजुरा येथे पोहोचले.त्यापुर्वी पुष्पाबाई हरविल्याची वार्ता संपूर्ण गावभर पसरली होती. घटना समजताच त्यांचा मोठा मुलगा गणेश पंढरपुरात दोन दिवसापूर्वीच दाखल झाला होता. शोधोशोध करुनही पुष्पाबाईचा मुलगा गणेशला थांगपत्ता लागला नव्हता. अखेर पोलिसात तक्रारही दाखल केली. मात्र ६ जुलैला रात्री ७ वाजता कोणतीही कल्पना नसताना शे.चांदभाई पुष् पाबाईला घेवुन दारावर दाखल झालेले बघताच नातेवाईकांच्या मायेचा बांध फुटला. मुस्लीम सदग्रहस्थाने दाखवलेल्या आपुलकीने तो देवदूत भेटला असल्याचे मत गावकर्‍यांनी व्यक्त केले.