शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पिक कर्जासाठी शिवसेनेचे स्टेट बँकेसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 15:57 IST

शेतकऱ्यांना नाहक त्रास देवुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन पिक कर्ज  देण्यास टाळाटाळ चालली आहे. याबाबत शिवसेनेच्यावतिने बँकेसमोर ४ मे रोजी निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे नवीन पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देवुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन पिक कर्ज  देण्यास टाळाटाळ चालली आहे.वारंवार निवेदन, स्मरणपत्रे देवुनही जाचक अट शिथील करण्याची मागणी केली होती. निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने ४ मे रोजी येथील स्टेट बँकेसमोर भव्य निदर्शने देवुनही अट शिथील करण्याची मागणी केली.

मानोरा  :  गेल्या पाच वर्षापासुन शेतकरी नापीकीच्या चक्रव्युहात अडकलेला असुन कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ असा नानाविध  संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गतर साथ देत नाहीच तर शासनाच्या प्रशासकीय धोरणही शेतकऱ्यांच्या  जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार चालुु केला आहे. याचे ज्वलंत उदाहरण मानोरा येथील स्थानिक भारतीय स्टेट बँकेने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना  नवीन पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देवुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन पिक कर्ज  देण्यास टाळाटाळ चालली आहे. याबाबत शिवसेनेच्यावतिने बँकेसमोर ४ मे रोजी निदर्शने करण्यात आली.

यासंदर्भात यापूर्वी उपतालुका प्रमुख युवराज जाधव, शहर  प्रमुख मनोहर राठोड, तालुका सचिव  प्रा.ओम बलोदे,  यांच्या नेतृत्वात वारंवार निवेदन, स्मरणपत्रे देवुनही जाचक अट शिथील करण्याची मागणी केली होती, परंतु निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने ४ मे रोजी येथील स्टेट बँकेसमोर भव्य निदर्शने देवुनही अट शिथील करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलक उपतालुका प्रमुख युवराज जाधव, शहर प्रमुख मनोहर राठोड,  तालुका सचिव प्रा.ओम बलोदे, डॉ.दिपक पाटील, करसडे, सुनिल जाधव, उपतालुका प्रमुख सर्कल प्रमुख नंदु पाटील चौधरी, वसंता राठोड, उपसर्कल प्रमुख  राठोड, रोहीदास चव्हाण, ब्रम्हा जाधव, रमेश भोयर, गोपाल भोयर, विष्णु चव्हाण, माऊली राठोड, प्रविण चव्हाण, रमेश राठोड,संदीप चव्हाण, आदिंसह शेकडो शेतकऱ्यांनी या निदर्शनाचे वेळी उपस्थिती होती.आंदोलनात स्थानिक पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता. यावेळी आंदोलकांनी तहसीलदार व  शाखा व्यवस्थापक यांना निवेदन देवुन या संवेदनशिल प्रश्नावर त्वरित दखल घेवुन मानोरा तालुक्यातील शेतकºयांना विनाअट विनाविलंब पिककर्जाचे वाटप करुन श्ेतकऱ्यांना बि बियाण्यांच्या खरेदीसाठी आवश्यक असणारा पैसा पिक कर्जाच्या माध्यमाने देवुन मदत  करावी, स्टेट बँकेने नवीन धोरण  आखत हजारो पिक कर्जमाफ झालेल्या श्ेतकऱ्यांना ४८०० रुपये भरावे लागत आहे तसेच  खंडाळा, भुली व सोयजना येथील शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ होवुनही आता नवीन कर्ज देण्यास   मानोरा स्टेट बँक  टाळाटाळ करीत नाकारत  आहे. एक प्रकारे हा त्यांच्यावर अन्याय असुन असे एक ना अनेक अफलातुन प्रकार मानोरा प्रकार अवलंबीत असुन या संपूर्ण बाबींचा तातडीने दखल घेवुन शेतकºयाना न्याय न दिल्यास शिवसेनेच्यावतीने यानंतरही उग्र स्वरुपाचे  तीव्र आंदोलन छेडण्यात येतील असल्याचे सुध्दा निवेदनात नमुद केले आहे.

टॅग्स :washimवाशिमSBIएसबीआयShiv Senaशिवसेना