शहरं
Join us  
Trending Stories
1
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
2
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
3
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
4
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
5
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
6
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
7
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
8
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
9
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
10
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
11
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप
12
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
13
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
14
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
15
कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती
16
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
17
₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!
18
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
19
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
20
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा

पिक कर्जासाठी शिवसेनेचे स्टेट बँकेसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 15:57 IST

शेतकऱ्यांना नाहक त्रास देवुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन पिक कर्ज  देण्यास टाळाटाळ चालली आहे. याबाबत शिवसेनेच्यावतिने बँकेसमोर ४ मे रोजी निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे नवीन पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देवुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन पिक कर्ज  देण्यास टाळाटाळ चालली आहे.वारंवार निवेदन, स्मरणपत्रे देवुनही जाचक अट शिथील करण्याची मागणी केली होती. निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने ४ मे रोजी येथील स्टेट बँकेसमोर भव्य निदर्शने देवुनही अट शिथील करण्याची मागणी केली.

मानोरा  :  गेल्या पाच वर्षापासुन शेतकरी नापीकीच्या चक्रव्युहात अडकलेला असुन कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ असा नानाविध  संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गतर साथ देत नाहीच तर शासनाच्या प्रशासकीय धोरणही शेतकऱ्यांच्या  जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार चालुु केला आहे. याचे ज्वलंत उदाहरण मानोरा येथील स्थानिक भारतीय स्टेट बँकेने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना  नवीन पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देवुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन पिक कर्ज  देण्यास टाळाटाळ चालली आहे. याबाबत शिवसेनेच्यावतिने बँकेसमोर ४ मे रोजी निदर्शने करण्यात आली.

यासंदर्भात यापूर्वी उपतालुका प्रमुख युवराज जाधव, शहर  प्रमुख मनोहर राठोड, तालुका सचिव  प्रा.ओम बलोदे,  यांच्या नेतृत्वात वारंवार निवेदन, स्मरणपत्रे देवुनही जाचक अट शिथील करण्याची मागणी केली होती, परंतु निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने ४ मे रोजी येथील स्टेट बँकेसमोर भव्य निदर्शने देवुनही अट शिथील करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलक उपतालुका प्रमुख युवराज जाधव, शहर प्रमुख मनोहर राठोड,  तालुका सचिव प्रा.ओम बलोदे, डॉ.दिपक पाटील, करसडे, सुनिल जाधव, उपतालुका प्रमुख सर्कल प्रमुख नंदु पाटील चौधरी, वसंता राठोड, उपसर्कल प्रमुख  राठोड, रोहीदास चव्हाण, ब्रम्हा जाधव, रमेश भोयर, गोपाल भोयर, विष्णु चव्हाण, माऊली राठोड, प्रविण चव्हाण, रमेश राठोड,संदीप चव्हाण, आदिंसह शेकडो शेतकऱ्यांनी या निदर्शनाचे वेळी उपस्थिती होती.आंदोलनात स्थानिक पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता. यावेळी आंदोलकांनी तहसीलदार व  शाखा व्यवस्थापक यांना निवेदन देवुन या संवेदनशिल प्रश्नावर त्वरित दखल घेवुन मानोरा तालुक्यातील शेतकºयांना विनाअट विनाविलंब पिककर्जाचे वाटप करुन श्ेतकऱ्यांना बि बियाण्यांच्या खरेदीसाठी आवश्यक असणारा पैसा पिक कर्जाच्या माध्यमाने देवुन मदत  करावी, स्टेट बँकेने नवीन धोरण  आखत हजारो पिक कर्जमाफ झालेल्या श्ेतकऱ्यांना ४८०० रुपये भरावे लागत आहे तसेच  खंडाळा, भुली व सोयजना येथील शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ होवुनही आता नवीन कर्ज देण्यास   मानोरा स्टेट बँक  टाळाटाळ करीत नाकारत  आहे. एक प्रकारे हा त्यांच्यावर अन्याय असुन असे एक ना अनेक अफलातुन प्रकार मानोरा प्रकार अवलंबीत असुन या संपूर्ण बाबींचा तातडीने दखल घेवुन शेतकºयाना न्याय न दिल्यास शिवसेनेच्यावतीने यानंतरही उग्र स्वरुपाचे  तीव्र आंदोलन छेडण्यात येतील असल्याचे सुध्दा निवेदनात नमुद केले आहे.

टॅग्स :washimवाशिमSBIएसबीआयShiv Senaशिवसेना