शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्याचे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:42 IST

प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तसेच ग्रामस्तरावर हा उपक्रम राबविण्यात आला. खरीप हंगाममध्ये शेतकरी अनेकवेळा स्वतःकडील बियाणे वापरतात; परंतु या ...

प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तसेच ग्रामस्तरावर हा उपक्रम राबविण्यात आला.

खरीप हंगाममध्ये शेतकरी अनेकवेळा स्वतःकडील बियाणे वापरतात; परंतु या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांची बियाणे उगवणबाबत होणारी फसवणूक टाळता येऊ शकते, असे मत कृषी सहायक संजय जहागीरदार व रुस्तुम सोनवने यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच शुभांगी वायकर, उपसरपंच नंदकिशोर वनस्कर व शेतकरी प्रवीण वायकर, शुभानंद बेलोकर, नंदकिशोर पाठक, रामभाऊ काटकर, संतोष राऊत, बालू महाजन, पप्पू राजेकर, अनंत बेलोकर, आदी उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गावोगावी असे प्रशिक्षण आयोजित केले जात आहेत. प्रात्यक्षिक नमुना- माल साठवून ठेवण्यासाठी असलेले पोत्याचे चौकोनी तुकडे करून, ते ओले करून त्यावर शंभर दाणे मोजून ते दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर दहा-दहाच्या रांगेमध्ये ठेवावेत, त्यावर हलकेसे पाणी शिंपडावे व त्याची गुंडाळी करून सावलीत ठेवावे. एक-दोन दिवसांनंतर अधूनमधून त्या गोणपाटावर पाणी मारावे, सहा ते सात दिवसांनंतर शंभरपैकी ७० बियाणे उगवण झालेले असतील, तर ते बियाणे पेरणी योग्य समजून पेरणीसाठी वापरावे. या बियाणे उगवण क्षमता चाचणीमुळे शेतकऱ्यांची बियाणे उगवणीबाबत खात्री होते व बियाणे न उगवण्याचा व पेरणी खर्च वाचतो.

ज्या बियाण्याची उगवण क्षमता चाचणी झालेली आहे, असे बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून पेरणी केल्यास उगवण क्षमता चांगली होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के निश्चित वाढ होते. शेतकऱ्यांनी कमी खर्चाची अशी उपाययोजना करून होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन कृषी विभागाचे कृषी सहायक संजय जहागीरदार यांनी केले आहे.