शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मंगरुळपीर येथील बंद पथदिवे सुरू करण्याची प्रहारची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:54 IST

मंगरुळपीर शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहराला दुभाजकासह चौपदरी रस्ते मिळाले आहेत. मानोरा रोड ते ...

मंगरुळपीर शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहराला दुभाजकासह चौपदरी रस्ते मिळाले आहेत. मानोरा रोड ते अकोला मार्गाच्या खरेदी-विक्री संघापर्यंत तसेच शेलगाव फाटा ते वाढा फाटा या भागापर्यंत दुभाजकांसह लाखो रुपयांचा निधी खर्च करून अत्याधुनिक पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, हे पथदिवे पालिकेने ताब्यात घेऊन कार्यान्वित करणे व नियमित देखभाल, दुरुस्ती करणे आवश्यक आहे; परंतु या कामात पालिकेला काही अडचणी आल्या असून त्यामुळे नागरिकांचे स्वप्न हवेतच विरत चालले आहे. पालिकेने रस्त्याचे कंत्राटदर व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्र देऊन महामार्गाच्या कामामुळे प्रभावित झालेल्या जोडरस्त्यांची यादी देऊन हे जोडरस्ते पूर्ण करून देण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत जोडरस्ते करून मिळत नाही तोपर्यंत पथदिव्यांचा ताबा न घेण्याची भूमिका पालिकेने घेतल्याचे कळते. ही भूमिका रास्त असली तरीही यात नागरिक मात्र दोन यंत्रणांच्या समन्वय व मतभेदांचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून याप्रकरणी होणारी मागणी पाहता प्रहारच्या विधिमंडळ कार्यालयाकडून याप्रकरणी नगर विकास मंत्रालयाचे प्रधान सचिवांना पत्रव्यवहार करण्यात आला. नगर विकास विभागाने प्रहारच्या या पत्रावरून जिल्हाधिकारी वाशिम यांना पत्र पाठविले आहे. याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यास सांगितले असून शासनास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

-----------------------------------------------------

शासन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दखल

मंगरुळपीर शहरातील पथदिवे सुरू व्हावे ही सर्वसामान्यांची इच्छा आहे. त्यासाठी प्रहारने सुद्धा पुढाकार घेतला असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. नगर विकास विभागाने याप्रकरणी कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी, वाशिम यांना कळवून अहवाल मागितला आहे. त्यासंबंधाने आज, सोमवार दि.१४ जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मंगरुळपीर शहरवासीयांची भावना पाहता पथदिव्यांचा प्रश्न शक्य तितक्या लवकर मार्गी लावू, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती प्रहार जनशक्ती विधान मंडळ पक्ष कार्यालयाचे सहसचिव अविनाश पाकधने यांनी दिली.