शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटप प्रक्रियेस गती देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST

या संदर्भातील निवेदनात नमूद आहे की, वाशिम जिल्ह्यासह मानोरा तालुक्यातील गावांमध्ये सिंचनाच्या पुरेशा सुविधा नाहीत. यामुळे रब्बी हंगामात विशेष ...

या संदर्भातील निवेदनात नमूद आहे की, वाशिम जिल्ह्यासह मानोरा तालुक्यातील गावांमध्ये सिंचनाच्या पुरेशा सुविधा नाहीत. यामुळे रब्बी हंगामात विशेष उत्पन्न हाती पडत नसल्याने अधिकांश शेतकऱ्यांना खरीप हंगामावरच अवलंबून राहावे लागते. या हंगामात शेतकरी सोयाबीन पेरणीवर विशेष भर देतात. त्यानुसार, याही वर्षी जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन असून त्यातील अर्ध्याअधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा राहणार आहे. खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांना ९०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्हाभरातील शाखांकडून शेतकऱ्यांना नियमानुसार पीककर्ज वाटप केले जात आहे; मात्र विविध स्वरूपातील कागदपत्रांच्या जाचक अटींमध्ये अडकवून राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीककर्ज वाटपाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.

दरम्यान, खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये चकरा मारत आहेत. असे असताना शेतकऱ्यांना सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार, कर्ज थकीत नसल्याबाबत इतर बँकांचे ‘नो ड्यूज,’ आदी कागदपत्रांसाठी त्रास देऊन कर्जवाटपास विलंब केला जात आहे. यामुळे कर्जाची रक्कम हातात कधी पडणार आणि पेरणीचे साहित्य खरेदी केव्हा करणार, या विवंचनेत अनेक शेतकरी अडकले आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने पीककर्ज वाटप प्रक्रिया सुलभ करून गती मिळण्यासंबंधी राष्ट्रीयीकृत बँकांना निर्देश द्यावे, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेने निवेदनात केली आहे.

...............................

कोट :

खरीप पेरणीसाठी २० ते २५ दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. असे असताना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याकरिता विविध स्वरूपांतील कागदपत्रांची मागणी केली जात आहे; मात्र सर्वत्र बंद असल्याने अनेक शेतकरी कागदपत्रांची पूर्तता करण्यात असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे प्रक्रिया सुलभ करून कर्जवाटपास गती देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा.

- मनोहर राठोड

अध्यक्ष, परिवर्तन शेतकरी संघटना