शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

गारपिटीमुळे नुकसान भरपाईसाठी ६.८४ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST

मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन वाशिम तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ३५ गावांमध्ये १९८९ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, गहू, हरभरा, ...

मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन वाशिम तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ३५ गावांमध्ये १९८९ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, गहू, हरभरा, मूग, ज्वारी, तीळ, भूईमुग, मका, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ३८ गावांमध्ये १६९५ हेक्टर, रिसोड तालुक्यातील ३ महसुली मंडळातील २३ गावांमध्ये ५१९ हेक्टर, मंगरूळपीर तालुक्यातील २ महसुली मंडळातील १६ गावांमध्ये २७४ हेक्टर, मानोरा व कारंजा तालुक्यातील ९ महसुली मंडळांतील २५ गावांमध्ये ५०६ हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले.

दरम्यान, या पिकांसाठी १३ मे रोजी पारित झालेल्या शासन निर्णयानुसार प्रतिहेक्टर १३ हजार ५०० रुपये मदत देय आहे. त्यानुषंगाने ६ कोटी ७३ लाख १० हजार ४६० रुपये मदतनिधीची गरज आहे. यासह ६३ हेक्टरवर नुकसान झालेल्या संत्रा, लिंबू आणि आंबा या पिकांकरिता १८ हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे ११ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा मदतनिधी आवश्यक आहे. तशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली आहे.

...........................

बाॅक्स :

१४७ गावांमध्ये झाले नुकसान

वाशिम तालुक्यातील ३५, मालेगाव ३८, रिसोड २३, मंगरूळपीर १६, मानोरा १७ आणि कारंजा तालुक्यातील १८ अशा एकूण १४७ गावांमधील कांदा, गहू, हरभरा, मूग, ज्वारी, सोयाबीन, मका, भाजीपाला, संत्रा, लिंबू, आंबा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे ६ हजार ९१२ शेतकरी बाधित झाले आहेत.

......................

नुकसानग्रस्त क्षेत्र व बाधित शेतकरीसंख्या

वाशिम तालुका - १९९८ हे./२१८४

मालेगाव तालुका - १७११ हे./२०२८

रिसोड तालुका - ५३५ हे./१६७७

मंगरूळपीर तालुका - २९४/३७०

मानोरा तालुका - ४६४/५८०

कारंजा तालुका - ४४/७३