शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

रासायनीक खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:44 IST

खासदार गवळी यांनी सदर पत्रात नमूद केले की, मागील एक ते सव्वा वर्षापासून कोविड-१९ या कोरोना संकटामुळे देश ...

खासदार गवळी यांनी सदर पत्रात नमूद केले की, मागील एक ते सव्वा वर्षापासून कोविड-१९ या कोरोना संकटामुळे देश व राज्य पातळीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने पीकविलेल्या शेतातील भाज्या, फळे, फुले यासह इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाची नुकसान भरपाइ ही शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या प्रमाणात पुरेशी नव्हती. त्यातच यावर्षी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रासायनिक खतांच्या कंपन्यांनी रासायनिक खतामध्ये जवळपास ६० टक्यापर्यंत दरवाढ केलेली आहे.परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याचे गवळी यांनी पत्रात म्हटले आहे. विविध प्रकारच्या आर्थीक संकटांना शेतकरी तोंड देत असतांना काही दिवसावर येवून ठेपलेल्या पावसाळयाच्या तोंडाशी रासायनिक खतांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. या वाढीमुळे देशातील शेतकरी शेतीचे नियोजन करीत असतांना प्रचंड प्रमाणात आर्थीक संकटात सापडेला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थीक अडचणींचा विचार करून केंद्र शासनाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रासायनिक खत कंपन्यांनी वाढविलेले दर कमी करावे अशी मागणी खासदर भावना गवळी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांना केली आहे.