शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:28 IST

कोरोना काळात शेतकरी खूपच हतबल झालेला आहे; मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणखीनच अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या या ...

कोरोना काळात शेतकरी खूपच हतबल झालेला आहे; मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणखीनच अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानाची भरपाई करून द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. याविषयी तहसीलदार शेलार यांना २३ जूनला निवेदन देण्यात आले आहे.

२०२१ च्या शेतकऱ्याच्या खरीप पिकाबाबत शासनाने जे चुकीचे धोरण अवलंबले आहे, त्यात प्रत्येक शेतकरी हा बी-बियाणांपासून वंचित आहे. ऐन पेरणीवेळी बी-बियाणांचा कृषी विभागाकडे असलेला तुटवड्यामुळे पेरणी लांबली. कसेबसे शेतकऱ्यांनी बी-बियाणे जमवून पेरणी केली; पण त्यातही निकृष्ट दर्जाचे बी मिळाले. त्यामुळे बहुतांश भाग हा दुबार पेरणीच्या संकटात आला. लोकांच्या जमीन पडीक पडून हातचे पैसे शेतकऱ्यांनी गमावल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी कर्जबाजारी झाला. तरी शासनाने शेतकऱ्याला झालेली आर्थिक नुकसानभरपाई करून द्यावी व शासनाने घोषित केल्याप्रमाणे बांधावर खत व बियाणे देण्याची घोषणा केली होती; पण बांधावरच नाही तर हे खत बियाणे दुकानातही उपलब्ध झाले नाही. झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर रिसोड तालुका अध्यक्ष सय्यद अकील सय्यद हुसेन, रवींद्र मोरे-पाटील, अनिल गरकळ, किरण ताई गिऱ्हे, गिरधर शेजुळ, प्रदीप खंडारे, रंगनाथ धांडे, अर्जुन डोंगरदिवे, विजय शिरसाट, केशव सभादिंडे, विश्वनाथ पारडे, गोपाल खडसे, आदी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.