शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आजीबाईंचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:39 IST

पूर्वीच्या काळात जेव्हा विशेषत: ग्रामीण भागात कुठलेही दवाखाने नव्हते, आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा अभाव होता, तेव्हा घरगुती उपचारांनीच विविध स्वरूपातील आजारांवर ...

पूर्वीच्या काळात जेव्हा विशेषत: ग्रामीण भागात कुठलेही दवाखाने नव्हते, आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा अभाव होता, तेव्हा घरगुती उपचारांनीच विविध स्वरूपातील आजारांवर मात केली जात असे. स्वयंपाकात हळद, जिरे, लसूणाचा नियमित समावेश, हळद टाकून दूध पिणे, तुळस, दालचिनी, काळे मिरे आणि मनुका एकत्रितरित्या पाण्यात टाकून उकळून घेतल्यानंतर त्याचा काढा करून पिणे, तीळ, नारळाचे तेल किंवा शुद्ध तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये लावणे, पुदिन्याची पाने किंवा ओवा एकत्रित उकळून घेतल्यानंतर पाण्याची वाफ घेणे, यासारख्या घरगुती तथा अत्यंत कमी खर्चातील उपचारांनी सर्दी, खोकला, कफ, घशामध्ये वेदना होण्याचा त्रास दूर होतो, यावर आजही अनेकांचा दृढ विश्वास आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामान्य लक्षणे आढळणाऱ्या अनेकांकडून यासारख्या घरगुती उपचारांचा सर्वाधिक वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

.......................

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण

३७९७१

कोरोनामुक्त रुग्ण

३३८०७

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण

३७५६

कोरोना मृत्यू

४०७

.................

कोट :

सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्यास पुदिना झाडाची पाने आणि ओवा एकत्रित करून पाण्यात उकळून घ्यावा. तीन ते चारवेळा या पाण्याची वाफ घेतल्यास दोन्ही त्रास अल्पावधीतच दूर होतात.

- अनुसया संभाजी गरकळ

...............

कोरोना संसर्गामध्ये छातीत कफ होणे, घशात तीव्र वेदना होण्याची लक्षणे दिसून येतात. या त्रासापासून सुटका होण्यासाठी लवंग बारीक करून पावडर मध किंवा साखरेत मिश्रण करून घ्यावे. लवकरच आराम पडतो.

- बालिबाई रामधन राठोड

...............

तुळशीची पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे एकत्र करून त्याची पावडर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखी प्यायल्याने आरोग्यासाठी खूप फायदा होतो. ताप, सर्दीतून यामुळे लवकर बरे होता येते.

- पवित्राबाई रामचंद्र मनवर

........................

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कशाचा काय फायदा?

ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, छातीत कफ दाटणे ही कोरोना विषाणू संसर्गाची सर्वसामान्य लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाकडून अनेकवेळा स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ताप आल्यास एक चमचा तुळशीच्या पानांचा रस, एक चमचा अद्रकचा रस, एक चमचा मध हे मिश्रण दिवसातून चारवेळा प्राशन केल्यास तापातून लवकर दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सर्दी झाल्यास अद्रक, काळे मिरे आणि तुळशीची पाने टाकून चहासारखे प्यावे. एक चमचा मध व अर्धा चमचा दालचिनीचे मिश्रण दिवसातून दोन ते तीनवेळा घ्यावे. लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या ठेचून त्याचे सेवन करावे, ओव्याची पुरचुंडी करून त्याचा वारंवार वास घ्यावा. यामुळे श्वसन मार्ग मोकळा होऊन सर्दीतून लवकर दिलासा मिळविता येणे शक्य आहे.

खोकला आल्यास अद्रक पाण्यात उकळून ते पाणी कोमट असतानाच प्राशन करावे. एक चमचा अद्रकचा रस, एक चमचा तुळशीच्या पानांचा रस आणि तीन चमचे मध हे मिश्रण दिवसातून तीनवेळा घेतल्याने खोकल्याच्या त्रासापासून लवकर सुटका करता येऊ शकते; मात्र सर्दी, खोकला आणि ताप अधिक प्रमाणात असल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात.

....................

कोट :

गुळवेल, गूळ, अद्रक, दालचिनी, लवंग, हळद आणि तुळशीची पाने एकत्र करून उकळून घेतल्यानंतर त्याचा एक कप काढा दिवसातून दोनवेळा घेतल्यास सर्दी, खोकला, तापातून बरे वाटण्यासह रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. आरोग्य सुदृढ राहण्याकरिता अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रीका यासारखे प्राणायाम दररोज करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाच्या काळात या घरगुती उपचारांवर प्रत्येकाने भर द्यायला हवा.

- डाॅ. बालाजी डाखोरे