शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

आजीबाईंचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:39 IST

पूर्वीच्या काळात जेव्हा विशेषत: ग्रामीण भागात कुठलेही दवाखाने नव्हते, आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा अभाव होता, तेव्हा घरगुती उपचारांनीच विविध स्वरूपातील आजारांवर ...

पूर्वीच्या काळात जेव्हा विशेषत: ग्रामीण भागात कुठलेही दवाखाने नव्हते, आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा अभाव होता, तेव्हा घरगुती उपचारांनीच विविध स्वरूपातील आजारांवर मात केली जात असे. स्वयंपाकात हळद, जिरे, लसूणाचा नियमित समावेश, हळद टाकून दूध पिणे, तुळस, दालचिनी, काळे मिरे आणि मनुका एकत्रितरित्या पाण्यात टाकून उकळून घेतल्यानंतर त्याचा काढा करून पिणे, तीळ, नारळाचे तेल किंवा शुद्ध तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये लावणे, पुदिन्याची पाने किंवा ओवा एकत्रित उकळून घेतल्यानंतर पाण्याची वाफ घेणे, यासारख्या घरगुती तथा अत्यंत कमी खर्चातील उपचारांनी सर्दी, खोकला, कफ, घशामध्ये वेदना होण्याचा त्रास दूर होतो, यावर आजही अनेकांचा दृढ विश्वास आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामान्य लक्षणे आढळणाऱ्या अनेकांकडून यासारख्या घरगुती उपचारांचा सर्वाधिक वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

.......................

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण

३७९७१

कोरोनामुक्त रुग्ण

३३८०७

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण

३७५६

कोरोना मृत्यू

४०७

.................

कोट :

सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्यास पुदिना झाडाची पाने आणि ओवा एकत्रित करून पाण्यात उकळून घ्यावा. तीन ते चारवेळा या पाण्याची वाफ घेतल्यास दोन्ही त्रास अल्पावधीतच दूर होतात.

- अनुसया संभाजी गरकळ

...............

कोरोना संसर्गामध्ये छातीत कफ होणे, घशात तीव्र वेदना होण्याची लक्षणे दिसून येतात. या त्रासापासून सुटका होण्यासाठी लवंग बारीक करून पावडर मध किंवा साखरेत मिश्रण करून घ्यावे. लवकरच आराम पडतो.

- बालिबाई रामधन राठोड

...............

तुळशीची पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे एकत्र करून त्याची पावडर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखी प्यायल्याने आरोग्यासाठी खूप फायदा होतो. ताप, सर्दीतून यामुळे लवकर बरे होता येते.

- पवित्राबाई रामचंद्र मनवर

........................

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कशाचा काय फायदा?

ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, छातीत कफ दाटणे ही कोरोना विषाणू संसर्गाची सर्वसामान्य लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाकडून अनेकवेळा स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ताप आल्यास एक चमचा तुळशीच्या पानांचा रस, एक चमचा अद्रकचा रस, एक चमचा मध हे मिश्रण दिवसातून चारवेळा प्राशन केल्यास तापातून लवकर दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सर्दी झाल्यास अद्रक, काळे मिरे आणि तुळशीची पाने टाकून चहासारखे प्यावे. एक चमचा मध व अर्धा चमचा दालचिनीचे मिश्रण दिवसातून दोन ते तीनवेळा घ्यावे. लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या ठेचून त्याचे सेवन करावे, ओव्याची पुरचुंडी करून त्याचा वारंवार वास घ्यावा. यामुळे श्वसन मार्ग मोकळा होऊन सर्दीतून लवकर दिलासा मिळविता येणे शक्य आहे.

खोकला आल्यास अद्रक पाण्यात उकळून ते पाणी कोमट असतानाच प्राशन करावे. एक चमचा अद्रकचा रस, एक चमचा तुळशीच्या पानांचा रस आणि तीन चमचे मध हे मिश्रण दिवसातून तीनवेळा घेतल्याने खोकल्याच्या त्रासापासून लवकर सुटका करता येऊ शकते; मात्र सर्दी, खोकला आणि ताप अधिक प्रमाणात असल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात.

....................

कोट :

गुळवेल, गूळ, अद्रक, दालचिनी, लवंग, हळद आणि तुळशीची पाने एकत्र करून उकळून घेतल्यानंतर त्याचा एक कप काढा दिवसातून दोनवेळा घेतल्यास सर्दी, खोकला, तापातून बरे वाटण्यासह रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. आरोग्य सुदृढ राहण्याकरिता अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रीका यासारखे प्राणायाम दररोज करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाच्या काळात या घरगुती उपचारांवर प्रत्येकाने भर द्यायला हवा.

- डाॅ. बालाजी डाखोरे