शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजीबाईंचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:39 IST

पूर्वीच्या काळात जेव्हा विशेषत: ग्रामीण भागात कुठलेही दवाखाने नव्हते, आरोग्यविषयक सोईसुविधांचा अभाव होता, तेव्हा घरगुती उपचारांनीच विविध स्वरूपांतील आजारांवर ...

पूर्वीच्या काळात जेव्हा विशेषत: ग्रामीण भागात कुठलेही दवाखाने नव्हते, आरोग्यविषयक सोईसुविधांचा अभाव होता, तेव्हा घरगुती उपचारांनीच विविध स्वरूपांतील आजारांवर मात केली जात असे. स्वयंपाकात हळद, जीरे, लसणीचा नियमित समावेश, हळद टाकून दूध पिणे, तुळस, दालचिनी, काळे मिरे आणि मनुका एकत्रितरीत्या पाण्यात टाकून उकळून घेतल्यानंतर त्याचा काढा करून पिणे, तीळ, नारळाचे तेल किंवा शुद्ध तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये लावणे, पुदिन्याची पाने किंवा ओवा एकत्रित उकळून घेतल्यानंतर पाण्याची वाफ घेणे. यांसारख्या घरगुती तथा अत्यंत कमी खर्चातील उपचारांनी सर्दी, खोकला, कफ, घशामध्ये वेदना होण्याचा त्रास दूर होतो, यावर आजही अनेकांचा दृढ विश्वास आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामान्य लक्षणे आढळणाऱ्या अनेकांकडून यांसारख्या घरगुती उपचारांचा सर्वाधिक वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

.......................

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण

३७,९७१

कोरोनामुक्त रुग्ण

३३,८०७

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण

३,७५६

कोरोना मृत्यू

४०७

.................

कोट :

सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्यास पुदिन्याची पाने आणि ओवा एकत्रित करून पाण्यात उकळून घ्यावे. तीन ते चार वेळा या पाण्याची वाफ घेतल्यास दोन्ही त्रास अल्पावधीतच दूर होतात.

- अनुसया संभाजी गरकळ

...............

कोरोना संसर्गामध्ये छातीत कफ होणे, घशात तीव्र वेदना होण्याची लक्षणे दिसून येतात. या त्रासापासून सुटका होण्यासाठी लवंग बारीक करून पावडर मध किंवा साखरेत मिश्रण करून घ्यावे. लवकरच आराम पडतो.

- बालीबाई रामधन राठोड

...............

तुळशीची पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे एकत्र करून त्याची पावडर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखी प्यायल्याने आरोग्यासाठी खूप फायदा होतो. ताप, सर्दीतून यामुळे लवकर बरे होता येते.

- पवित्राबाई रामचंद्र मनवर

........................

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कशाचा काय फायदा?

ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, छातीत कफ दाटणे ही कोरोना विषाणू संसर्गाची सर्वसामान्य लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाकडून अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, ताप आल्यास एक चमचा तुळशीच्या पानांचा रस, एक चमचा अद्रकचा रस, एक चमचा मध हे मिश्रण दिवसांतून चार वेळा प्राशन केल्यास तापातून लवकर दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सर्दी झाल्यास अद्रक, काळे मिरे आणि तुळशीची पाने टाकून चहासारखे प्यावे. एक चमचा मध व अर्धा चमचा दालचिनीचे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे. लसणीच्या पाच ते सहा पाकळ्या ठेचून त्याचे सेवन करावे, ओव्याची पुरचुंडी करून त्याचा वारंवार वास घ्यावा. यामुळे श्वसन मार्ग मोकळा होऊन सर्दीतून लवकर दिलासा मिळविता येणे शक्य आहे.

खोकला आल्यास अद्रक पाण्यात उकळवून ते पाणी कोमट असतानाच प्राशन करावे. एक चमचा अद्रकचा रस, एक चमचा तुळशीच्या पानांचा रस आणि तीन चमचे मध हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घेतल्याने खोकल्याच्या त्रासापासून लवकर सुटका करता येऊ शकते. मात्र, सर्दी, खोकला आणि ताप अधिक प्रमाणात असल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात.

....................

कोट :

गुळवेल, गूळ, अद्रक, दालचिनी, लवंग, हळद आणि तुळशीची पाने एकत्र करून उकळून घेतल्यानंतर, त्याचा एक कप काढा दिवसातून दोन वेळा घेतल्यास सर्दी, खोकला, तापातून बरे वाटण्यासह रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आरोग्य सुदृढ राहण्याकरिता अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रिका यांसारखे प्राणायाम दररोज करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाच्या काळात या घरगुती उपचारांवर प्रत्येकाने भर द्यायला हवा.

- डाॅ.बालाजी डाखोरे