शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

चिचांबापेन येथील भारत माध्यमिक शाळेत दीप महोत्सव उत्साहात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:36 IST

रिसोड - रिसोड तालुक्यातील चिचांबापेन येथील भारत माध्यमिक शाळेत दि आर्य शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड. नकुल देशमुख, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष जगदीशराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली २ नोव्हेंबर रोजी दिप महोत्सव पार पडला.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी तयार केल्या विविध वस्तू

रिसोड - रिसोड तालुक्यातील चिचांबापेन येथील भारत माध्यमिक शाळेत दि आर्य शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड. नकुल देशमुख, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष जगदीशराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली २ नोव्हेंबर रोजी दिप महोत्सव पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या विविध वस्तू शाळा इमारतीवर लावण्यात  आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गजानन बानोरे तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक पि.के. साबळे, विनोद देशमुख उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करुन दिप प्रज्वलीत करण्यात आला. यावेळी बानोरे म्हणाले की, चैतन्याचा उत्साह म्हणजेच दिपावली. अश्विन मासातील रमा एकादशीनंतर येणारी वसुबारस म्हणजे प्रकाशोत्सवाची सुरुवात असते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदेनंतर येणारा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा, भगवान श्रीराम चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परतल्यानंतर नागरिकांनी दिव्यांची आरास मांडून रामाचे स्वागत केले. भारतीय जीवनात दिवाळीला धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. आनंद, पावित्र्य, प्रकाश उत्सव म्हणजेच दिपावली असल्याचे ते म्हणाले. शाळेतील विद्यार्थी, विद्याथीर्नींनी तयार करुन आणलेले आकाश कंदील, तोरण शालेय इमारतीवर लावण्यात आले. प्रत्येक वर्गाच्या समोर आकर्षक अशा रांगोळ्या काढून दीप लावण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून दिवाळी सण कसा साजरा केला याची माहिती दिली. शिक्षक सचिन चवरे, कैलास कालापाड यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिवाळी सणाच्या पाच दिवसाचे महत्व सविस्तर सांगितले. ज्येष्ठ शिक्षक साबळे, देशमुख यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चवरे यांनी तर आभार न.अ. देशमुख यांनी मानले.

टॅग्स :Schoolशाळा