शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा : रिपाइं पदाधिकाऱ्यांची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 13:54 IST

वाशिम - जिल्हयाची आणेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा त्वरीत दुष्काळग्रस्त घोषीत करुन न्याय द्यावा, अशी मागणी रिपाई (आठवले गट) पदाधिकाऱ्यांनी केली.

ठळक मुद्देप्रमुख पिकांची अंतिम आणेवारी सरासरी ४७ पैसे निघाली.घोषणा होवून एक महिना उलटला. परंतु  आतापावेतो जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झालेला नाही.

वाशिम - जिल्हयाची आणेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा त्वरीत दुष्काळग्रस्त घोषीत करुन न्याय द्यावा, अशी मागणी रिपाई (आठवले गट) पदाधिकाऱ्यांनी केली.या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान तेजराव वानखडे म्हणाले की, सन २०१७-१८ करीता खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम आणेवारी सरासरी ४७ पैसे निघाली. याची घोषणा होवून एक महिना उलटला. परंतु  आतापावेतो जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झालेला नाही. जिल्हयाला कुठल्या सवलती व सुविधा देणार हेही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. दुष्काळसदृष्य स्थितीमधील सवलतीच्या निकषामध्ये शासन स्तरावरुन बदल सुरु असल्याची माहिती असून सदर निकष जाहीर करण्यास विलंब लागत असल्याने नागरीक व शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आल्याने साहजिकच दृष्काळसदृश्य स्थितीत मिळणार्‍या विविध सवलतींच्या लाभाकरीता जिल्हा पात्र ठरला आहे. यासंदर्भात कुठलेच ठोस धोरण अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त वाशिम जिल्हयातील विविध गावात करावयाच्या विविध उपाययोजना तातडीने करणे आवश्यक झाले आहे. जिल्हयातील दृष्काळग्रस्त स्थिती पाहता शासनाने त्वरीत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची  मागणी तेजराव वानखडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान केली. टंचाईग्रस्त ७७४ गावामध्ये ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आवश्यकतेप्रमाणे कामे सुरु करावे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरव्दारे पाणीपुरवठा, मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवणे याशिवाय मंडळ स्तरावर चारा छावणी उघडण्यास मंजुरी देणे, जमीन महसुलात सुट, विजबिलामध्ये सुट, परिक्षा शुल्कात विद्यार्थ्यांना माफी आदी सुविधा मिळणे क्रमप्राप्त आहे. यावेळी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष मोहनसिंग राठोड, मालेगाव तालुका अध्यक्ष प्रकाश गवई, रिसोड तालुका अध्यक्ष हिरामन साबळे, रामदास भगत, संजय भिसे, किशोर अंभोरे, संदीप डिघोळे, पंढरी कंकाळ, उल्हास इंगोले, गोविंदराव इंगोले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिम