शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांना पदोन्नतीत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

वाशिम : महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये असलेले ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मागे घेऊन ...

वाशिम : महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये असलेले ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मागे घेऊन आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

भारतीय संविधान कलम १६ (४) अन्वये २००४ साली सेवाज्येष्ठतेच्या निर्णयानुसार मागासवर्गीय समाजाला ३३ टक्के आरक्षण देण्यात आले होते. मागासवर्गीय समाजाच्या आरक्षित जागांना कोणत्याही प्रकारे धक्का न लावता उर्वरित पदे ही खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. त्याचप्रमाणे सध्याच्या राज्य सरकारने देखील २० एप्रिल २०२१ रोजी मागासवर्गीयांसाठी पदोन्नतीची ३३ पदे राखीव ठेवून अन्य पदे ही सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु ७ मे २०२१ रोजी राज्य सरकारने पूर्वीचा ३३ टक्के पदोन्नती आरक्षणाचा निर्णय बदलून मागासवर्गीयांना आरक्षित असलेले पदोन्नतीचे आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गातून मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. घटनात्मकदृष्ट्या पदोन्नतीचे आरक्षण रोस्टर व बिंदू नियमावलीप्रमाणे देणे बंधनकारक असताना हे राज्य सरकार मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांची फसवणूक व संविधानाचा अवमान करीत असल्याचा गंभीर आरोप रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी केला. आरक्षण कायम ठेवावे अशी मागणी करण्यात आली. याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओ.बी.सी. समाजाचे आरक्षण रद्द करून महाराष्ट्रामध्ये घातलेला गोंधळ थांबवावा. गोरगरीब, कष्टकरी जनतेला लॉकडाऊनमुळे जगणे कठीण झाले आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा तत्काळ पुरवठा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनात रिपाइंचे कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, मालेगाव तालुका अध्यक्ष प्रकाश गवई, रिसोड तालुकाध्यक्ष हिरामण साबळे, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष तुकाराम खडसे, तालुका उपाध्यक्ष गजानन वानखेडे, धर्मराज वानखेडे, नितीन वानखेडे, गोपाल वानखेडे, विलास पाचपिल्ले, बळी वाठोरे, अनिकेत कांबळे, अनंता कांबळे, हर्षल सुत्राळे, विठ्ठल खडसे, कैलास मैंदकर, नंदू वानखेडे, सिद्धार्थ पाटील, आदींनी सहभाग घेतला.