शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मागासवर्गीयांना पदोन्नतीत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

वाशिम : महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये असलेले ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मागे घेऊन ...

वाशिम : महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये असलेले ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मागे घेऊन आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

भारतीय संविधान कलम १६ (४) अन्वये २००४ साली सेवाज्येष्ठतेच्या निर्णयानुसार मागासवर्गीय समाजाला ३३ टक्के आरक्षण देण्यात आले होते. मागासवर्गीय समाजाच्या आरक्षित जागांना कोणत्याही प्रकारे धक्का न लावता उर्वरित पदे ही खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. त्याचप्रमाणे सध्याच्या राज्य सरकारने देखील २० एप्रिल २०२१ रोजी मागासवर्गीयांसाठी पदोन्नतीची ३३ पदे राखीव ठेवून अन्य पदे ही सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु ७ मे २०२१ रोजी राज्य सरकारने पूर्वीचा ३३ टक्के पदोन्नती आरक्षणाचा निर्णय बदलून मागासवर्गीयांना आरक्षित असलेले पदोन्नतीचे आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गातून मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. घटनात्मकदृष्ट्या पदोन्नतीचे आरक्षण रोस्टर व बिंदू नियमावलीप्रमाणे देणे बंधनकारक असताना हे राज्य सरकार मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांची फसवणूक व संविधानाचा अवमान करीत असल्याचा गंभीर आरोप रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी केला. आरक्षण कायम ठेवावे अशी मागणी करण्यात आली. याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओ.बी.सी. समाजाचे आरक्षण रद्द करून महाराष्ट्रामध्ये घातलेला गोंधळ थांबवावा. गोरगरीब, कष्टकरी जनतेला लॉकडाऊनमुळे जगणे कठीण झाले आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा तत्काळ पुरवठा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनात रिपाइंचे कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, मालेगाव तालुका अध्यक्ष प्रकाश गवई, रिसोड तालुकाध्यक्ष हिरामण साबळे, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष तुकाराम खडसे, तालुका उपाध्यक्ष गजानन वानखेडे, धर्मराज वानखेडे, नितीन वानखेडे, गोपाल वानखेडे, विलास पाचपिल्ले, बळी वाठोरे, अनिकेत कांबळे, अनंता कांबळे, हर्षल सुत्राळे, विठ्ठल खडसे, कैलास मैंदकर, नंदू वानखेडे, सिद्धार्थ पाटील, आदींनी सहभाग घेतला.