शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचन विहिरीची अंतिम मुदत चार दिवसांवर!

By admin | Updated: February 7, 2017 03:02 IST

१0 फेब्रुवारीपर्यंत काम सुरू न झाल्यास विहिरी होणार रद्द

वाशिम, दि. ६- धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या व अद्याप काम सुरु न झालेल्या सिंचन विहिरींचे काम सुरु करण्यास १0 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विहित मुदतीत काम सुरु न केलेल्या लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरी रद्द होणार आहेत.
धडक सिंचन विहीर योजनेतून जिल्ह्याला ७ हजार ८00 सिंचन विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५ हजार ८६२ सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. तसेच ४७६ सिंचन विहिरींची कामे प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आली होती; मात्र अनेक वेळा वाढीव मुदत देऊनही अद्याप अनेक पात्र लाभार्थ्यांनी सिंचन विहिरींची कामे सुरु न केल्याने या सिंचन विहिरी रद्द करण्याचे प्रस्तावित होते.
दरम्यान, शेतकर्‍यांना जाणवणार्‍या अडचणी लक्षात घेऊन शासनाने ज्यांनी विहिरी मंजूर होऊनही कामे केली नाहीत, अशा शेतकर्‍यांना सिंचन विहिरींची काम सुरु करण्यास १0 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. आता जे लाभार्थी १0 फेब्रुवारीपयर्ंत सिंचन विहिरींची कामे सुरु करतील, त्यांच्याच सिंचन विहिरी पुनर्जीवित करण्यात येतील. तसेच या मुदतीत काम सुरु न करणार्‍या लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरी रद्द करण्याची धडक कारवाई केल्या जाणार आहे. मुदतीनंतर त्यांचा आक्षेपदेखील विचारात घेतला जाणार नाही. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी याबाबत कुठलीही अडचण असल्यास अधिक माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

१५ दिवसांत सुरू झाले केवळ ५0 विहिरींची कामे
जिल्ह्यातील अपूर्णावस्थेत असलेल्या ४७६ विहिरींची कामे सुरू करण्यासाठी १0 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची बाब रोजगार हमी योजना विभागाने २२ नोव्हेंबर रोजी जाहीर केली. त्यास आज रोजी १५ दिवसाचा कालावधी उलटला आहे. असे असताना ४७६ पैकी उण्यापुर्‍या ५0 विहिरींचीच कामे सुरू झाली आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली.