शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

चवथ्या दिवशी आढळले ‘त्या’ दोघांचे मृतदेह

By admin | Updated: February 18, 2015 01:58 IST

काटेपूर्णा नदीत ट्रक पडून झाला होता अपघात.

मालेगाव (जि. वाशिम) : मुंबई-नागपूर हायवेवर जऊळका जवळील काटेपूर्णा नदीवरील पुलावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात ट्रक नदीत पडून दोन जण बेपत्ता झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यावेळी ट्रकमधील दोघे जण वाचले होते. त्यापैकी बेपत्ता झालेले दोघा जणांचे मृतदेह १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान सापडले. १४ फेब्रुवारीच्या रात्री ८.३0 वाजताच्या दरम्यान अकोला जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील मुकुंद नामदेव भोंबरे, भावना नामदेव भोंबरे, ङ्म्रेयस मुकुल भोंबरे व ट्रक चालक सचिन इंगळे हे मूर्ती बनविण्यासाठी येत असलेली पावडर व मोटारसायकलसह इतर साहित्य घेऊन पुणे येथे जात होते. काटेपूर्णा नदीनजीक खड्डा चुकविण्याच्या नादात ट्रक नदीत पुलावरून खाली कोसळला. त्यामध्ये मुकुंद नामदेव भोंबरे व भावना नामदेव भोंबरे हे वाचले मात्र त्यांचा मुलगा ङ्म्रेयस व वाहनचालक इंगळे मात्र आढळले नाही. त्यानंतर महान-पिंजर, वाशिम येथील आपत्कालीन बचावपथकाने शोधकार्य केले. दरम्यान, ट्रक बाहेर काढला. त्यावेळी दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. त्यामध्ये यश येत नव्हते म्हणून १६ फेब्रुवारीला दुपारी रास्ता रोको करण्यात आला होता. त्यावेळी मूर्तीजापूरचे आ. हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, तहसीलदार जे.आर. बियाते यांच्यासह अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी भेटी दिल्या; मात्र अपयश येत होते. सतत तीन दिवसांपासून क्रेनद्वारे, बचाव पथकाद्वारे बेपत्ता दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाच्यावतीने करण्यात आला; मात्र अपयश आल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात होता. आज अखेर १७ फेब्रुवारी रोजी त्यांचे मृतदेह होडीने पाणी हलवले त्यावेळी सापडले, अशी माहिती पोलीस प्रशासनातर्फे पो.कॉ. प्रेमदास आडे यांनी सांगितले. त्या पुलावरून वारंवार अपघात होतात, त्यामुळे आता तरी त्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी येथील उपस्थित नागरिकांकडून करण्यात येत आहे.