शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

चवथ्या दिवशी आढळले ‘त्या’ दोघांचे मृतदेह

By admin | Updated: February 18, 2015 01:58 IST

काटेपूर्णा नदीत ट्रक पडून झाला होता अपघात.

मालेगाव (जि. वाशिम) : मुंबई-नागपूर हायवेवर जऊळका जवळील काटेपूर्णा नदीवरील पुलावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात ट्रक नदीत पडून दोन जण बेपत्ता झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यावेळी ट्रकमधील दोघे जण वाचले होते. त्यापैकी बेपत्ता झालेले दोघा जणांचे मृतदेह १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान सापडले. १४ फेब्रुवारीच्या रात्री ८.३0 वाजताच्या दरम्यान अकोला जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील मुकुंद नामदेव भोंबरे, भावना नामदेव भोंबरे, ङ्म्रेयस मुकुल भोंबरे व ट्रक चालक सचिन इंगळे हे मूर्ती बनविण्यासाठी येत असलेली पावडर व मोटारसायकलसह इतर साहित्य घेऊन पुणे येथे जात होते. काटेपूर्णा नदीनजीक खड्डा चुकविण्याच्या नादात ट्रक नदीत पुलावरून खाली कोसळला. त्यामध्ये मुकुंद नामदेव भोंबरे व भावना नामदेव भोंबरे हे वाचले मात्र त्यांचा मुलगा ङ्म्रेयस व वाहनचालक इंगळे मात्र आढळले नाही. त्यानंतर महान-पिंजर, वाशिम येथील आपत्कालीन बचावपथकाने शोधकार्य केले. दरम्यान, ट्रक बाहेर काढला. त्यावेळी दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. त्यामध्ये यश येत नव्हते म्हणून १६ फेब्रुवारीला दुपारी रास्ता रोको करण्यात आला होता. त्यावेळी मूर्तीजापूरचे आ. हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, तहसीलदार जे.आर. बियाते यांच्यासह अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी भेटी दिल्या; मात्र अपयश येत होते. सतत तीन दिवसांपासून क्रेनद्वारे, बचाव पथकाद्वारे बेपत्ता दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाच्यावतीने करण्यात आला; मात्र अपयश आल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात होता. आज अखेर १७ फेब्रुवारी रोजी त्यांचे मृतदेह होडीने पाणी हलवले त्यावेळी सापडले, अशी माहिती पोलीस प्रशासनातर्फे पो.कॉ. प्रेमदास आडे यांनी सांगितले. त्या पुलावरून वारंवार अपघात होतात, त्यामुळे आता तरी त्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी येथील उपस्थित नागरिकांकडून करण्यात येत आहे.