शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

वाशिम जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 13:25 IST

सोयाबीनच्या पिकाचे १२ हजारांहून अधिक, तर मुग आणि उडिदाचे मिळून ३ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

वाशिम : जिल्ह्यात यंदा आॅगस्ट महिन्यात आलेल्या संततधार पावसामुळे १५ हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीनच्या पिकाचे १२ हजारांहून अधिक, तर मुग आणि उडिदाचे मिळून ३ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.वाशिम जिल्ह्यात २.९३ लक्ष हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. हे पीक २० ते २५ दिवसाचे झाल्यानंतर यावर उंटअळी, चक्रीभुंगा, खोडमाशी या किडींचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला. या किडीवर नियंत्रणासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले. त्यानंतर १० आॅगस्टपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व संततधार पाऊस पडल्याने सोयाबीन पिकावर खोडावरील, शेंगावरील करपा रोग, तसेच पाने पिवळी पडण्याचे प्रकार दिसून आला. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशी नाशकाची फवारणी करण्याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन केले. त्यानंतरही सततच्या पावसामुळे तब्बल १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. उर्वरीत सोयाबीन पिकाची स्थिती समाधानकारक आहे. त्याशिवाय जिल्ह्यात यंदा ६६४३ हेक्टर क्षेत्रावर मुग पिकाची पेरणी झाली. या पिकाच्या शेंगा परिपक्व होत असतानाच पावसाने रिपरिप सुरू केली. त्यामुळे शेंगामध्ये कोंब फुटून या पिकाचा दर्जा खालावला. कृषी विभागाच्या अंदाजानुसार सततच्या पावसामुळे एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावरील अर्थात २ हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील मुग पिकाचे नुकसान झाले आहे, तर जिल्ह्यात ९५४३ हेक्टर क्षेत्रावर उडिद पिकाची पेरणी झाली असताना आणि हे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचून या पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव आढळुन आला. त्यात १० आॅगस्टपासून आलेल्या संततधार पावसामुळे जवळपास १ हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील उडिद पिकाला फटका बसला.यंदा आॅगस्ट महिन्यात १० तारखेपासून पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना प्रामुख्याने सोयाबीन, उडिद आणि मूग पिकाला फटका बसला आहे. या पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार तिन्ही पिके मिळून जवळपास १४ ते १५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती