शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 13:25 IST

सोयाबीनच्या पिकाचे १२ हजारांहून अधिक, तर मुग आणि उडिदाचे मिळून ३ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

वाशिम : जिल्ह्यात यंदा आॅगस्ट महिन्यात आलेल्या संततधार पावसामुळे १५ हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीनच्या पिकाचे १२ हजारांहून अधिक, तर मुग आणि उडिदाचे मिळून ३ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.वाशिम जिल्ह्यात २.९३ लक्ष हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. हे पीक २० ते २५ दिवसाचे झाल्यानंतर यावर उंटअळी, चक्रीभुंगा, खोडमाशी या किडींचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला. या किडीवर नियंत्रणासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले. त्यानंतर १० आॅगस्टपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व संततधार पाऊस पडल्याने सोयाबीन पिकावर खोडावरील, शेंगावरील करपा रोग, तसेच पाने पिवळी पडण्याचे प्रकार दिसून आला. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशी नाशकाची फवारणी करण्याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन केले. त्यानंतरही सततच्या पावसामुळे तब्बल १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. उर्वरीत सोयाबीन पिकाची स्थिती समाधानकारक आहे. त्याशिवाय जिल्ह्यात यंदा ६६४३ हेक्टर क्षेत्रावर मुग पिकाची पेरणी झाली. या पिकाच्या शेंगा परिपक्व होत असतानाच पावसाने रिपरिप सुरू केली. त्यामुळे शेंगामध्ये कोंब फुटून या पिकाचा दर्जा खालावला. कृषी विभागाच्या अंदाजानुसार सततच्या पावसामुळे एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावरील अर्थात २ हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील मुग पिकाचे नुकसान झाले आहे, तर जिल्ह्यात ९५४३ हेक्टर क्षेत्रावर उडिद पिकाची पेरणी झाली असताना आणि हे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचून या पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव आढळुन आला. त्यात १० आॅगस्टपासून आलेल्या संततधार पावसामुळे जवळपास १ हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील उडिद पिकाला फटका बसला.यंदा आॅगस्ट महिन्यात १० तारखेपासून पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना प्रामुख्याने सोयाबीन, उडिद आणि मूग पिकाला फटका बसला आहे. या पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार तिन्ही पिके मिळून जवळपास १४ ते १५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती