शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घन ओथंबून येती अन् हुरहूर लावून जाती!

By admin | Updated: July 6, 2014 23:28 IST

आता अपेक्षा पुनर्वसूकडून : सर्वांच्या नजरा आकाशाकडे

मेहकर : पावसाळ्यातील दुसरा महिना उजाडुनही पावसाने हजेरी लावली नाही. आजपासून पुनर्वसू नक्षत्र लागले असून, सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गत दोन दिवसांपासून तर घन ओथंबून येताहेत आणि सर्वांना पावसाची हुरहूर लावून जात आहेत. पावसाच्या दडीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलण बिघडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पावसाळ्यातील जून महिन्यात मृग व आद्रा ही दोन्ही नक्षत्रे पुर्णत: कोरडी गेली. तर जुलै महिन्यात ६ जुलै पासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले असून, या नक्षत्राच्या मुहूर्तावर आकाशात फक्त ढग दाटुन येत आहेत. मात्र, पावसाची सरही कोसळली नाही. यंदा पुनर्वसू नक्षत्राचे गर्दभ हे वाहन असून, गर्दभ जिकडे चालले तिकडे चालले म्हणजे कुठे पाऊस पडेल व कुठे ढग कोरडेच फिरतील. अशीच काही स्थिती दिसत आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे जलस्त्रोताची पातळीही खालावत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट निर्माण होऊन भविष्यात भिषण पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेहकर, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी धुळ पेरणी केलेली असून त्यावर निसर्गाच्या अवकृपेमुळे बहुतांश धुळ पेरणी वाया गेली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे माघामोलाचे बियाणे मातीत गेले आहेत. अनेक शेतकर्‍यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. या दिवसांत पूरजन्य परिस्थितीमुळे नदीनाले साफ स्वच्छ होऊन दुथडी भरुन वाहत असतात. परंतू, निसर्गाच्या विचित्र बदलामुळे नदीनाले व इतर जलस्त्रोत कोरडी ठण्ण पडली आहेत. तर काही नदी नाल्यांमध्ये थोड्या बहुत प्रमाणात जलसाठा असून, त्यातही शेवाळजन्य व कचरा घाण निर्माण झाल्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. प्रदुषण मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाले आहे. पाऊस पडत नसल्याने नदीनाले व इतर जलस्त्रोतांमध्येही अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.पावसाच्या हुलकावणीमूळे सर्वांचीच चिंता वाढत असून, गावागावांमध्ये वरुणराजाला विनवणी करण्यात येत असल्याचे दिसुन येत आहे. ९ जुलै रोजी आषाढी एकादशी असून, पंढरपूरच्या विठूरायाची शेतकर्‍यांसाठी मेहरनजर होवू शकते, अशी विठ्ठल भक्तांची परंपरागत चालत आलेली आगाढ श्रद्धा आहे. त्यामुळे १0 जुलै नंतर मोसमी पावसाच्या साधक बाधक सरी कोसळतील व १२ जुलै आषाढी गुरू पोर्णिमेनंतर दमदार पाऊस होवून पेरण्या सुरू होतील. असा धर्मिक भावनेचा व हवामान शास्त्राचा अंदाज आहे.