शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

घन ओथंबून येती अन् हुरहूर लावून जाती!

By admin | Updated: July 6, 2014 23:28 IST

आता अपेक्षा पुनर्वसूकडून : सर्वांच्या नजरा आकाशाकडे

मेहकर : पावसाळ्यातील दुसरा महिना उजाडुनही पावसाने हजेरी लावली नाही. आजपासून पुनर्वसू नक्षत्र लागले असून, सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गत दोन दिवसांपासून तर घन ओथंबून येताहेत आणि सर्वांना पावसाची हुरहूर लावून जात आहेत. पावसाच्या दडीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलण बिघडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पावसाळ्यातील जून महिन्यात मृग व आद्रा ही दोन्ही नक्षत्रे पुर्णत: कोरडी गेली. तर जुलै महिन्यात ६ जुलै पासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले असून, या नक्षत्राच्या मुहूर्तावर आकाशात फक्त ढग दाटुन येत आहेत. मात्र, पावसाची सरही कोसळली नाही. यंदा पुनर्वसू नक्षत्राचे गर्दभ हे वाहन असून, गर्दभ जिकडे चालले तिकडे चालले म्हणजे कुठे पाऊस पडेल व कुठे ढग कोरडेच फिरतील. अशीच काही स्थिती दिसत आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे जलस्त्रोताची पातळीही खालावत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट निर्माण होऊन भविष्यात भिषण पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेहकर, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी धुळ पेरणी केलेली असून त्यावर निसर्गाच्या अवकृपेमुळे बहुतांश धुळ पेरणी वाया गेली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे माघामोलाचे बियाणे मातीत गेले आहेत. अनेक शेतकर्‍यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. या दिवसांत पूरजन्य परिस्थितीमुळे नदीनाले साफ स्वच्छ होऊन दुथडी भरुन वाहत असतात. परंतू, निसर्गाच्या विचित्र बदलामुळे नदीनाले व इतर जलस्त्रोत कोरडी ठण्ण पडली आहेत. तर काही नदी नाल्यांमध्ये थोड्या बहुत प्रमाणात जलसाठा असून, त्यातही शेवाळजन्य व कचरा घाण निर्माण झाल्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. प्रदुषण मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाले आहे. पाऊस पडत नसल्याने नदीनाले व इतर जलस्त्रोतांमध्येही अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.पावसाच्या हुलकावणीमूळे सर्वांचीच चिंता वाढत असून, गावागावांमध्ये वरुणराजाला विनवणी करण्यात येत असल्याचे दिसुन येत आहे. ९ जुलै रोजी आषाढी एकादशी असून, पंढरपूरच्या विठूरायाची शेतकर्‍यांसाठी मेहरनजर होवू शकते, अशी विठ्ठल भक्तांची परंपरागत चालत आलेली आगाढ श्रद्धा आहे. त्यामुळे १0 जुलै नंतर मोसमी पावसाच्या साधक बाधक सरी कोसळतील व १२ जुलै आषाढी गुरू पोर्णिमेनंतर दमदार पाऊस होवून पेरण्या सुरू होतील. असा धर्मिक भावनेचा व हवामान शास्त्राचा अंदाज आहे.