शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

कोट्यवधी रुपयांचा निधी परतीच्या मार्गावर!

By admin | Updated: March 27, 2017 02:23 IST

मानोरा नगर पंचायतचा चुकीचा प्रस्ताव; त्रुटींची पूर्तता करण्याच्या कामी हयगय.

वाशिम, दि. २६- जिल्ह्यातील नवनिर्मित नगर पंचायतींच्या विकासासाठी गत दोन वर्षात कोट्यवधींचा निधी शासनाकडून आलेला आहे. हा निधी प्राप्त करण्यासाठी मानोरा नगर पंचायतने चक्क चुकीचा प्रस्ताव सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्रूटी दूर करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची ताकिद दिल्यानंतरही, अद्याप जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला नाही.फेब्रुवारी २0१५ मध्ये राज्यातील काही ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा बहाल करण्यात आला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मानोरा व मालेगाव या दोन नगर पंचायतीचा समावेश आहे. या नवनिर्मित नगर पंचायतींसाठी शासनाने विविध योजनेंतर्गत सन २0१५-१६ या वर्षात कोट्यवधींचा निधी मंजूर केलेला आहे. मालेगाव नगर पंचायतने परिपूर्ण प्रस्ताव सादर करून नियोजित कामांवर निधी खर्च करण्याला सुरूवातही केली. मात्र, मानोरा नगर पंचायतने अपूर्ण व त्रूटींचा प्रस्ताव सादर करून निधीची मागणी केली. सन २0१५-१६ या वर्षात वैशिष्टयपूर्ण योजनेतून तीन कोटी, विशेष रस्ता अनुदान योजनेतून दोन कोटी, नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय योजनेंतर्गत सहा कोटी, रस्ता अनुदान निधीमधून २0 लाख असा एकंदरित ११ कोटी २0 लाख रुपयांचा निधी मानोरा नगर पंचायतला मिळाला आहे. सदर निधी मानोरा नगर पंचायतच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी नोंदविण्याच्या सूचना नगराध्यक्ष रेखा पाचडे यांनी मुख्याधिकार्‍यांना केल्या. मात्र, मागणी नोंदविण्यात न आल्याने हा निधी मानोरा नगर पंचायतच्या बँक खात्यावर जमा होऊ शकला नाही. ११ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित कामांसाठी मिळावा, यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. मानोरा मुख्याधिकार्‍यांनी पाठविलेल्या प्रस्तावात चुकींचा कळस गाठला असल्याचे स्पष्ट होते. जिल्हाधिकारी व नगर परिषद जिल्हा प्रशासन अधिकार्‍यांनी या प्रस्तावात एकूण सहा त्रूट्या काढल्या असून, परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची ताकिद २२ फेब्रुवारी २0१७ रोजी लेखी पत्राद्वारे दिली. मात्र, अद्यापही त्रूटींची पुर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला नाही. या वृत्ताला खुद्द जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच दुजोरा दिला आहे. पाच दिवसांवर ह्यमार्च एन्डिंगह्ण येऊन ठेपला आहे. परिपूर्ण प्रस्ताव वेळेपूर्वी सादर झाला नाही तर निधी परत जाण्याची भीती वर्तविली जात आहे. कोणत्याही प्रकारचा निधी प्राप्त नसल्याने शहराचा विकास ठप्प आहे.