शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोट्यवधी रुपयांचा निधी परतीच्या मार्गावर!

By admin | Updated: March 27, 2017 02:23 IST

मानोरा नगर पंचायतचा चुकीचा प्रस्ताव; त्रुटींची पूर्तता करण्याच्या कामी हयगय.

वाशिम, दि. २६- जिल्ह्यातील नवनिर्मित नगर पंचायतींच्या विकासासाठी गत दोन वर्षात कोट्यवधींचा निधी शासनाकडून आलेला आहे. हा निधी प्राप्त करण्यासाठी मानोरा नगर पंचायतने चक्क चुकीचा प्रस्ताव सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्रूटी दूर करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची ताकिद दिल्यानंतरही, अद्याप जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला नाही.फेब्रुवारी २0१५ मध्ये राज्यातील काही ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा बहाल करण्यात आला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मानोरा व मालेगाव या दोन नगर पंचायतीचा समावेश आहे. या नवनिर्मित नगर पंचायतींसाठी शासनाने विविध योजनेंतर्गत सन २0१५-१६ या वर्षात कोट्यवधींचा निधी मंजूर केलेला आहे. मालेगाव नगर पंचायतने परिपूर्ण प्रस्ताव सादर करून नियोजित कामांवर निधी खर्च करण्याला सुरूवातही केली. मात्र, मानोरा नगर पंचायतने अपूर्ण व त्रूटींचा प्रस्ताव सादर करून निधीची मागणी केली. सन २0१५-१६ या वर्षात वैशिष्टयपूर्ण योजनेतून तीन कोटी, विशेष रस्ता अनुदान योजनेतून दोन कोटी, नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय योजनेंतर्गत सहा कोटी, रस्ता अनुदान निधीमधून २0 लाख असा एकंदरित ११ कोटी २0 लाख रुपयांचा निधी मानोरा नगर पंचायतला मिळाला आहे. सदर निधी मानोरा नगर पंचायतच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी नोंदविण्याच्या सूचना नगराध्यक्ष रेखा पाचडे यांनी मुख्याधिकार्‍यांना केल्या. मात्र, मागणी नोंदविण्यात न आल्याने हा निधी मानोरा नगर पंचायतच्या बँक खात्यावर जमा होऊ शकला नाही. ११ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित कामांसाठी मिळावा, यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. मानोरा मुख्याधिकार्‍यांनी पाठविलेल्या प्रस्तावात चुकींचा कळस गाठला असल्याचे स्पष्ट होते. जिल्हाधिकारी व नगर परिषद जिल्हा प्रशासन अधिकार्‍यांनी या प्रस्तावात एकूण सहा त्रूट्या काढल्या असून, परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची ताकिद २२ फेब्रुवारी २0१७ रोजी लेखी पत्राद्वारे दिली. मात्र, अद्यापही त्रूटींची पुर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला नाही. या वृत्ताला खुद्द जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच दुजोरा दिला आहे. पाच दिवसांवर ह्यमार्च एन्डिंगह्ण येऊन ठेपला आहे. परिपूर्ण प्रस्ताव वेळेपूर्वी सादर झाला नाही तर निधी परत जाण्याची भीती वर्तविली जात आहे. कोणत्याही प्रकारचा निधी प्राप्त नसल्याने शहराचा विकास ठप्प आहे.