शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

पिककर्ज वाटपास प्रारंभ; ७१७ सभासदांना ६ कोटींचे कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 16:34 IST

कारंजा :  दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने खरीप हंगाम २०१९-२० करीता पिककर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने खरीप हंगाम २०१९-२० करीता पिककर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला असून कारंजा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ७ शाखांमधील ७१७ सभासदांना ५ कोटी ९९ लाख ९ हजार रूपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीधर पाटील कानकिरड यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामरगाव शाखा कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात पात्र सभासद शेतकºयांना १६ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता पिककजार्चे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीधर पाटील कानकिरड , बँकेचे वरीष्ठ निरीक्षक डी. एम . वानखडे, धनज शाखा निरीक्षक एम .आर. महल्ले, कामरगाव शाखा निरीक्षक पी. एन .जाधव, कारंजा शाखा निरीक्षक जी. डी .उजाडे, एस .बी .देशमुख व उंबडार्बाजार शाखा निरीक्षक बी. एस. मोहीते यांच्यासह बँक कर्मचाºयांची व पात्र सभासद शेतकºयांची उपस्थिती होती. कारंजा तालुक्यात कारंजासह कामरगाव, मनभा, उंबडार्बाजार, काजळेश्वर, पोहा व धनज अशा ७  ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जाळे पसरले असून स्थानिक सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून पात्र श्ोतकरी सभासदांना दरवर्षी खरीप पिककजार्चे वाटप करण्यात येते. अध्यापपर्यंत दुसºया एकाही बँकेने पिककजार्चे वाटप न केल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेने पात्र शेतकरी सभासदांना पिककर्ज वाटप केल्याने शेतकºयांना दिलासा मिळाल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयातून उमटत आहे. खरीप पिककर्ज वाटपात पारदर्शकता यावी या उद्देशाने पिककजार्चे वितरण हे एटीएम कार्डद्वारे करण्यात येते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे एटीएम कार्ड येण्यास उशिर झाल्याने पिककजार्तील अर्धी रक्कम सभासद शेतकºयाच्या बचत खात्यात वळती करण्यात आल्याने ऐन गरजेच्यावेळी पैसा कामी पडल्याने शेतकºयांच्या चेहºयावर समाधान स्पष्टपणे झळकत होते. आतापर्यंत एकुण ६६१  सभासदांना एटीएम कार्ड प्राप्त झाले असून एटीएम कार्डद्वारे शेतकºयांनी पिककजार्ची रक्कम काढणे सुरू केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून देखील आतापर्यंत ७४ टक्के कर्ज वसुली केली आहे. तर काही शेतकºयांची कर्जमाफी झाल्याने ते शेतकरी सुध्दा नवीन पिककर्ज घेण्यास पात्र ठरले आहे. एकंदरीत ऐन अडचणीच्या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतीमशागतीच्या दृष्टीने  पिककर्जवाटप केल्याने शेतकºयातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाCrop Loanपीक कर्ज