शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नीलगाय, रोहींकडून पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

रिसोड : तालुक्यातील गणेशपूर शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नीलगाय व रोही उद्‌ध्वस्त करत आहेत. नीलगाय व रोहींचा वन विभागाने ...

रिसोड : तालुक्यातील गणेशपूर शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नीलगाय व रोही उद्‌ध्वस्त करत आहेत. नीलगाय व रोहींचा वन विभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १९ जुलै रोजी वन विभागाकडे केली आहे.

निवेदनात नमूद केले की, मांगवाडी परिसरात असलेल्या जंगलात रोही व नीलगायींनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. या परिसरात अडीचशे ते तीनशे नीलगायी व रोही असून, शेतकऱ्यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास ठिय्या मांडून ते उभे पीक उद्ध्वस्त करतात. परिणामी, या भागातील शेतकरी रोही व नीलगायीला त्रस्त झाले असून, कायमस्वरूपी यावर तोडगा काढावा, अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांनी वन विभागाला देऊन रोही व नीलगायींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर गणेशपूर शिवारातील शेतकरी शंकर देशमुख, संतोष देशमुख, तुकाराम देशमुख, छगन हजारे, अशोकराव देशमुख, अमोल देशमुख, सुभाष हजारे, रामराव देशमुख, अशोक तिडके, किशोर तिडके, केशव पावडे, प्रदीप पावडे, गणेश तिडके आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)

०००००००

कोट

मांगवाडी, गणेशपूर शेतशिवारात रोही व नीलगायींनी अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांचे निवेदनसुद्धा प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल.

-संजय वानखडे,

क्षेत्र सहायक वन विभाग, रिसोड