शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नीलगाय, रोहींकडून पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

रिसोड : तालुक्यातील गणेशपूर शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नीलगाय व रोही उद्‌ध्वस्त करत आहेत. नीलगाय व रोहींचा वन विभागाने ...

रिसोड : तालुक्यातील गणेशपूर शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नीलगाय व रोही उद्‌ध्वस्त करत आहेत. नीलगाय व रोहींचा वन विभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १९ जुलै रोजी वन विभागाकडे केली आहे.

निवेदनात नमूद केले की, मांगवाडी परिसरात असलेल्या जंगलात रोही व नीलगायींनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. या परिसरात अडीचशे ते तीनशे नीलगायी व रोही असून, शेतकऱ्यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास ठिय्या मांडून ते उभे पीक उद्ध्वस्त करतात. परिणामी, या भागातील शेतकरी रोही व नीलगायीला त्रस्त झाले असून, कायमस्वरूपी यावर तोडगा काढावा, अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांनी वन विभागाला देऊन रोही व नीलगायींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर गणेशपूर शिवारातील शेतकरी शंकर देशमुख, संतोष देशमुख, तुकाराम देशमुख, छगन हजारे, अशोकराव देशमुख, अमोल देशमुख, सुभाष हजारे, रामराव देशमुख, अशोक तिडके, किशोर तिडके, केशव पावडे, प्रदीप पावडे, गणेश तिडके आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)

०००००००

कोट

मांगवाडी, गणेशपूर शेतशिवारात रोही व नीलगायींनी अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांचे निवेदनसुद्धा प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल.

-संजय वानखडे,

क्षेत्र सहायक वन विभाग, रिसोड