शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

७७0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: April 14, 2015 01:19 IST

रिसोडमध्ये सर्वाधिक नुकसान; कारंजा तालुक्यात १0९ घरांची पडझड.

वाशिम : ९ ते १२ एप्रिलदरम्यानच्या अवकाळी पाऊस व वादळ-वार्‍याने जिल्हय़ातील ७७0 हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांना अवकाळी फटका दिल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणातून समोर येत आहे. ९ ते १२ एप्रिलपर्यंत जिल्हय़ात वादळ-वारा आणि अवकाळी पावसाने ठाण मांडले होते. ऐन भरीस आलेला भाजीपाला, फळबागा उद्ध्वस्त होत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाला फेस आला. १२ एप्रिलला सायंकाळी ४ वाजेनंतर १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हय़ात सरासरी ११.८३ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस रिसोड तालुक्यात ३२ मिमी झाला आहे. त्याखालोखाल कारंजा तालुक्यात १८.८0 मिमी, मालेगाव ७ मिमी, वाशिम व मानोरा प्रत्येकी ५ मिमी, तर मंगरुळपीर तालुका ३.२0 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. रिसोड तालुक्यात २३२ हेक्टर, वाशिम तालुका १२५ हेक्टर, कारंजा व मानोरा प्रत्येकी ५0 हेक्टर, मालेगाव १00 हेक्टर, मंगरुळपीर २0८ असे एकूण ७७0 हेक्टरवरील रब्बी पीक, भाजीपाला, आंबा, फळबागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारंजा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळ वार्‍यामुळे १0९ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. म्हसला येथील ६३ व टाकळी येथील ४६ घरांची पडझड झाली आहे. तर काजळेश्‍वर, भांमदेवी परिसरातील कांदा व केळी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार चेतन गिरासे यांनी दिली. मालेगाव तालुक्यात १२ एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस चांगला बरसला. यामध्ये ४ गावातील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित गावचे पंचनामे सुरू आहेत. सर्व गावचे पंचनामे करून अंतिम अहवाल आल्यानंतर नुकसानाची निश्‍चित माहिती हाती येणार आहे. पंचनामे करताना कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना कर्मचार्‍यांना दिल्याची माहिती नायब तहसीलदार डाबेराव यांनी दिली.