शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जिल्ह्यातील ३९२ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST

उन्हाळ्याला सुरुवात झाली की, दरवर्षी जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. गतवर्षी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने आणि त्यानंतरही परतीचा पाऊस ...

उन्हाळ्याला सुरुवात झाली की, दरवर्षी जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. गतवर्षी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने आणि त्यानंतरही परतीचा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा होता. मात्र, सिंचनासाठी पाण्याचा बऱ्याच प्रमाणात उपसा झाल्याने प्रकल्पातील जलसाठ्यात कमालीची घट आली. पाणीटंचाई निवारणार्थ दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे कृती आराखडा तयार केला जातो. या वर्षीच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी मिळालेली असून, ३९२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ४२२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात हातपंप बंद असल्यानेही नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. वाशिम तालुक्यासह रिसोड, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट गडद होत असल्याने, प्रस्तावित उपाययोजनांची आतापासूनच प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत विहीर अधिग्रहणासाठी प्रशासनातर्फे चाचपणी सुरू आहे. टँकरचे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडून प्राप्त नसल्याने, सध्या जिल्ह्यातील एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. जिल्ह्यातील २२ गावांमध्ये एप्रिल ते मे या महिन्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असून, प्राप्त प्रस्तावानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे. मालेगाव तालुक्यातील राजुरा, खैरखेडा, रिसोड तालुक्यातील करंजी, कवठा, भर जहाँगीर परिसर, वाशिम तालुक्यातील काटा, तामसाळा आदी परिसरातही पाणीटंचाईची तिव्रता अधिक असते. यंदाही या परिसरात पाणीटंचाईचे संकट घोंघावत असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा गावकरी बाळगून आहेत. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी २८३ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. विहीर अधिग्रहण केल्यानंतर, अनेक ठिकाणी ‘विहीर अधिग्रहण’ असा फलकही संबंधित विहीर परिसरात लावण्यात येत नाही. त्यामुळे कोणत्या विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले, याची माहिती संबंधित गावातील नागरिकांना मिळत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी विहीर अधिग्रहण केल्यानंतर तेथे फलक लावण्यात यावा, असा सूरही ग्रामीण भागातून उमटत आहे.

.........

बॉक्स

पाणीटंचाई आराखडा मंजूर

जिल्ह्यातील ३९२ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ तयार करण्यात आलेला आराखडा जिल्हा प्रशासनाने मंजूर केला आहे. पाणीटंचाईची तीव्रता असलेल्या गावांमध्ये प्रस्तावित उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. ४२२ उपाययोजनांवर चार कोटी ९० लाख १७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

००००

बॉक्स

सद्यस्थितीत एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा नाही

जिल्ह्यातील २२ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत एकाही ठिकाणावरून टँकरने पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. प्राप्त प्रस्तावानुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

०००

बॉक्स

६७ ठिकाणी नवीन कूपनलिका

पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यात ६७ ठिकाणी नवीन कूपनलिका घेण्याचे कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. शक्यतोवर मार्चअखेरीस किंवा एप्रिल, मे महिन्यात नवीन कूपनलिका घेण्यात येतील.

००

बॉक्स

विहिरी अधिग्रहणासाठी चाचपणी

पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यातील २८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रशासनातर्फे चाचपणी केली जात आहे. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करू शकेल, अशा विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. विहीर अधिग्रहण केल्यानंतर संबंधित विहिरीतून वैयक्तिकरीत्या पाणी घेण्यास मनाई केली जाणार असून, या विहिरीतील पाणी गावकऱ्यांसाठी उपयोगात आणले जाणार आहे.

०००

जिल्ह्यातील एकूण गावे - ७९१

पाणीटंचाईची समस्या भेडसावणारी गावे - ३९२

बोअरवेलची दुरुस्ती होणार - ००

विहिरींमधील गाळ काढला जाणार - ००

बोअरवेलचे जिल्ह्यात खोदकाम होणार - ६७

पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती होणार - ४२