शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

ठिकठिकाणी दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 6, 2014 23:26 IST

बर्‍याच शेतकर्‍यांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पाऊस येईल या आशेत अडकलेल्या बळीराजावर दरवर्षी संकटाचा सामना करावा लागत आहे.

कारंजालाड : कारंजा ,मानोरा व मंगरुळपीर तालुक्यातील गावांमध्ये मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आनंदित होऊन परिसरातील बर्‍याच शेतकर्‍यांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पाऊस येईल या आशेत अडकलेल्या बळीराजावर दरवर्षी संकटाचा सामना करावा लागत आहे. मागीलवर्षी झालेल्या अतवृष्टीमुळे संकटात सापडलेला शेतकरी यावर्षी त्याची भरपाई निघेल या आशेने आपल्या शेताची मशागत करून निसर्ग राजाची वाट पाहत होता. मृग नक्षत्र राजाची वाट पाहत होता. मृग नक्षत्र लागताच चौसाळा पारवा मोहगव्हाण,लोहगाव-महागाव व मानोरा परिसरात अवकाळी पण समाधानकारक पाऊस पडल्याने आनंदित होवून शेतकर्‍यांनी पेरणीची सुरूवात केली. आज ना उद्या पाऊस येईलच या आशेने जवळपास ८0 टक्के पेरण्या आटोपल्या.कमी पावसात पेरणी झाल्याने बियाणे अंकुरले .पण नंतर पाऊस न आल्याने अंकुरलेले कोंब जागच्या जागीच करपून गेले.महागडे बियाणे एकदाच घेणे शेतकर्‍यांना कठीण असते आता दुबार पेरणी करावयाची वेळ आल्यास कोठून पैसे आणावे असा प्रश्न शेतकर्‍यांना समोर उभा राहिला आहे.त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत महसूल विभागामार्फत सर्वे करून तत्काळ दुबारा पेरणीसाठी मदत जाहीर करावी अशी मागणी चौसाळा परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे. अनेक शेतकर्‍यांनी सावकाराकडून कर्ज घेतले असून पावसाच्या चिंतेत असलेला शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. पाऊस नसल्याने सर्व प्रकारच्या वस्तू महाग झाल्या असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. अशा शेतकर्‍यावर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे झाले आहे. पावसाच्या विलंबामुळे गुराढोरांचा चार्‍यांचा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. घरातील साठवलेला चारा संपला आहे. आता कठिण दिवस पाहण्याची पाळी येत आहे. जून महिना संपून जुलैचे आगमन झाले तरी पावसाने दडी मारल्याने सर्व शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाले आहे. शेतकरी सुखी तर मजूरवर्गही सुखी राहतो. पण आज रोजी मजूरवर्ग कामासाठी वनवन भटकत असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी निर्माण झाली आहे. निसर्ग संकटामुळे शेतात पेरलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी शेलू बु. येथील अरुण मस्के, रामदास मस्के व रमेश पवार यांनी तहसीलदारांकडे ४ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.पाऊस यावा म्हणून गावागावात धोंडी धोंडीच्या माध्यमातून वरूणराजाची प्रार्थना सुरू केली असून अनेक ठिकाणी देवाजवळ अभिषेक करण्यात येत आहे व प्रार्थना होत आहे.