शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ठिकठिकाणी दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 6, 2014 23:26 IST

बर्‍याच शेतकर्‍यांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पाऊस येईल या आशेत अडकलेल्या बळीराजावर दरवर्षी संकटाचा सामना करावा लागत आहे.

कारंजालाड : कारंजा ,मानोरा व मंगरुळपीर तालुक्यातील गावांमध्ये मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आनंदित होऊन परिसरातील बर्‍याच शेतकर्‍यांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पाऊस येईल या आशेत अडकलेल्या बळीराजावर दरवर्षी संकटाचा सामना करावा लागत आहे. मागीलवर्षी झालेल्या अतवृष्टीमुळे संकटात सापडलेला शेतकरी यावर्षी त्याची भरपाई निघेल या आशेने आपल्या शेताची मशागत करून निसर्ग राजाची वाट पाहत होता. मृग नक्षत्र राजाची वाट पाहत होता. मृग नक्षत्र लागताच चौसाळा पारवा मोहगव्हाण,लोहगाव-महागाव व मानोरा परिसरात अवकाळी पण समाधानकारक पाऊस पडल्याने आनंदित होवून शेतकर्‍यांनी पेरणीची सुरूवात केली. आज ना उद्या पाऊस येईलच या आशेने जवळपास ८0 टक्के पेरण्या आटोपल्या.कमी पावसात पेरणी झाल्याने बियाणे अंकुरले .पण नंतर पाऊस न आल्याने अंकुरलेले कोंब जागच्या जागीच करपून गेले.महागडे बियाणे एकदाच घेणे शेतकर्‍यांना कठीण असते आता दुबार पेरणी करावयाची वेळ आल्यास कोठून पैसे आणावे असा प्रश्न शेतकर्‍यांना समोर उभा राहिला आहे.त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत महसूल विभागामार्फत सर्वे करून तत्काळ दुबारा पेरणीसाठी मदत जाहीर करावी अशी मागणी चौसाळा परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे. अनेक शेतकर्‍यांनी सावकाराकडून कर्ज घेतले असून पावसाच्या चिंतेत असलेला शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. पाऊस नसल्याने सर्व प्रकारच्या वस्तू महाग झाल्या असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. अशा शेतकर्‍यावर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे झाले आहे. पावसाच्या विलंबामुळे गुराढोरांचा चार्‍यांचा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. घरातील साठवलेला चारा संपला आहे. आता कठिण दिवस पाहण्याची पाळी येत आहे. जून महिना संपून जुलैचे आगमन झाले तरी पावसाने दडी मारल्याने सर्व शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाले आहे. शेतकरी सुखी तर मजूरवर्गही सुखी राहतो. पण आज रोजी मजूरवर्ग कामासाठी वनवन भटकत असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी निर्माण झाली आहे. निसर्ग संकटामुळे शेतात पेरलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी शेलू बु. येथील अरुण मस्के, रामदास मस्के व रमेश पवार यांनी तहसीलदारांकडे ४ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.पाऊस यावा म्हणून गावागावात धोंडी धोंडीच्या माध्यमातून वरूणराजाची प्रार्थना सुरू केली असून अनेक ठिकाणी देवाजवळ अभिषेक करण्यात येत आहे व प्रार्थना होत आहे.