शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

जिल्हाधिका-यांनी जाणून घेतल्या डाळिंब उत्पादकांच्या व्यथा!

By admin | Updated: December 24, 2015 02:43 IST

फळबागांसाठी पाणी मिळण्याची शेतक-यांची मागणी.

मंगरुळपीर (जि. वाशिम): जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी मंगरुळपीर येथील शेतकरी प्रतापराव बाबरे यांच्या वाढा शिवारातील डाळिंब बागेला २२ डिसेंबर रोजी भेट देऊन पाहणी केली असता, उपस्थित शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मंगरुळपीर येथील शेतकरी बाबरे यांच्या वाढा शिवारातील १२ एकर डाळिंब बागेला जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या भेटीदरम्यान पॅकिंग हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेत त्या विनाविलंब निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे यांना दिल्या. डाळिंबाची उत्कृष्ट दर्जाची फळे असतानाही त्यास केवळ ४६ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने शेतकर्‍यांनी खंत व्यक्त केली. तसेच जलयुक्त शिवार योजनेचा लाभ प्रत्येक गावातील शेतकर्‍यांना मिळाला तर बारमाही फळबागेचे उत्पादन घेता येईल. यासह महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची २ हेक्टर र्मयादेची अट शिथिल झाली तर सीताफळ या पिकास जिल्ह्यामध्ये लागवड होण्यास भरपूर वाव मिळेल, ही बाब उपस्थित शेतकर्‍यांनी यावेळी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. सोबतच कोणत्याही फळ पिकास प्लास्टिक मल्चिंग असल्यास त्याव्दारे पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. यासाठी मात्र शासनाने पुरेसे अनुदान द्यायला हवे. शेजारी जिल्ह्यांमध्ये मल्चिंग योजनेला अनुदान मिळते; मात्र वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची खंत शेतकर्‍यांनी बोलून दाखविली. यावेळी प्रतापराव बाबरे, सतीश बाबरे, प्रमोद बाबरे, विनोद बाबरे, बाळु पाटील गावंडे, देवलाल ठाकरे, प्रवीण ठाकरे, मंगळसा ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत पाकधने, शंकरराव सावके, यशवंत धोटे, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.