शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

वाशिम जिल्ह्यातील कापूस जातोय बाहेरच्या जिल्ह्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:35 IST

वाशिम जिल्ह्यात यंदा २५ आॅक्टोबरपासून तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासनाने जाहीर केलेला हमीभाव आधीच कमी असताना व्यापा-यांकडूनही चांगले दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील कापूस अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात नेण्यात येत असल्याचे चित्र आहे

ठळक मुद्देअल्पदराचा परिणामहमीभाव वाढविण्याची शेतक-यांची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : जिल्ह्यात यंदा २५ आॅक्टोबरपासून तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासनाने जाहीर केलेला हमीभाव आधीच कमी असताना व्यापा-यांकडूनही चांगले दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील कापूस अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात नेण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने यंदा अमरावती विभागात २५ आॅक्टोबर पासून ३९ शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तथापि, शासनाने जाहीर केलेले प्रति क्विंटल ४३२० रुपये दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहेत. विभागातील यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात व्यापाºयांकडून बºयापैकी दर देण्यात येत आहेत; परंतु वाशिम जिल्ह्यात नेमके शासनाच्या हमीभावापेक्षा शंभर दिडशे रुपये अधिक भाव देऊन शेतकºयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कापूस उत्पादक शेतकºयांना मात्र हे दर परवडणारे नसल्याने मानोरा, कारंजासह मंगरुळपीर तालुक्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकरी अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात कापूस नेत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ७० हून अधिक शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असतानाही गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील तिन्ही शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप क्विंटलभर कापूसही खरेदी झालेला नाही. उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा लागली आहे.   

टॅग्स :cottonकापूस