शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परजिल्ह्यातील कापूस वाशिम जिल्ह्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:28 IST

यवतमाळ जिल्ह्यासह, अकोला, हिंगोली व इतर जिल्ह्यातील कापूस या केंद्रावर दाखल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या काही दिवसांत खासगी बाजारात कपाशीच्या दरात मोठी घसरण झाल्याने कापूस उत्पादकांनी शासकीय खरेदी केंद्राकडे मोर्चा वळविला आहे. त्यात वाशिम जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यासह, अकोला, हिंगोली व इतर जिल्ह्यातील कापूस या केंद्रावर दाखल होत असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची पंचाईत झाली असून, कापूस मोजणीसाठी दोन दिवस लागत असल्याने शेतकऱ्यांना वाहन भाड्याचा भुर्दंडही सोसावा लागत आहे.यंदाच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यात ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात कपाशीची लागवड झाली. प्रामुख्याने मानोरा, मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात कपाशीची लागवड होती. नोव्हेंबर, डिसेंबरमधील अवकाळी पावसाचा फटका वगळता कपाशीचे उत्पादनही चांगले झाले. तथापि, कापसाची खरेदी सुरू झाल्यानंतर खासगी बाजारात कापसाचे दर गडगडले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. दरम्यान, जिल्ह्यात अनसिंग आणि मंगरुळपीर येथे थेट सीसीआयने, तर मानोरा आणि कारंजा येथे सीसीआयचे उपअभिकर्ता (सबएजंट) म्हणून कापूस पणन महासंघाने कपाशीची खरेदी सुरु केली. बाजारात दर घटल्याने शासकीय खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, आजवर १.५० लाख क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी या केंद्रावर झाली आहे. मंगरुळपीर आणि अनसिंगसह कारंजा येथील केंद्रावर वाहनांच्या मोठ्या रांगा उभ्या असल्याचे दिसून येत आहे. त्यातच यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील कापूसही येथे विक्रीसाठी येत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस मोजणीला प्रचंड विलंब होत आहे.

 शेतकºयाचा दोन दिवस मुक्कामकोठारी: मंगरुळपीर येथे बियाणी जिनिंग फॅ क्टरीत सीसीआयचे खरेदी केंद्र आहे. या ठिकाणी मंगरुळपीर तालुक्यातील अनेक शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. त्यात कोठारी येथील ज्ञानेश्वर हिमगिरे, रामेश्वर हिमगिरे, गणेश करडे आणि विठ्ठल पवार या शेतकºयांनी १६ मार्च रोजी सकाळी कापूस मोजणीसाठी आणल्यानंतरही १७ मार्च रोजी ६ वाजेपर्यंतही त्यांच्या कपाशीची मोजणी होऊ शकली नव्हती. परजिल्ह्यातील कापूस, येथे येत असल्याने आम्हाला दोन दिवस मुक्काम करावा लागतो. त्यामुळे इतर कामे खोळंबतात आणि वाहनभाड्याचा अतिरिक्त भुर्दंडही सोसावा लागत असल्याचे कोठारी येथील शेतकरी विठ्ठल पवार यांनी सांगितले.सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर देशातील कोठूनही आलेला कापूस खरेदी करावा लागतो. आम्हाला शेतकºयास नकार देता येत नाही. कापसाची आवक वाढल्याने क्रमांकानुसार मोजणी करण्यात येत आहे.- उमेश तायडे,सीसीआय खरेदी केंद्रप्रमुखमंगरुळपीर,

मानोरा येथील खरेदी केंद्रावरपूर्वी कापूस मोजणीला विलंब होत असे; परंतु शेतकºयांना विलंब होऊ नये म्हणून, बाजार समितीच्यावतीने एसएमएस पाठवून मोजणीच्या दिवशीच बोलावण्यात येत आहे.-एस. बी. जाजू, ग्रेडर, मानोरा,कापूस पणन महासंघ

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस