शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

शेतक-यांनी केली कापसाची होळी

By admin | Updated: December 30, 2014 00:41 IST

केंद्र सरकारच्या कापूस धोरणाचा निषेध

वाशिम : राष्ट्रीय किसान जागृती अभियानाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कापूस नीतीचा विरोध करीत गावागावात कापसाची होळी करून आपला निषेध नोंदवला. तालुक्यातील ग्राम कोकलगाव येथे २८ डिसेंबर रोजी कापूस जाळण्यात आला.कापसाची होळी या आंदोलनात परिसरातील शेतकर्‍यांनी उपस्थित राहून आपले सर्मथन दर्शवले. मागील सरकारच्या काळात देशातील व प्रामुख्याने विदर्भातील कापूस उत्पादकांचे मोठे बेहाल झाले होते. परिणामी देशात व प्रामुख्याने विदर्भात कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या मोठय़ा प्रमाणात आत्महत्याही झाल्या. या शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा समोर करून सत्तेत आलेल्या नवीन सरकारनेही आता जुन्याच सरकारच्या नीती धोरणांचा अवलंब केल्याने पुन्हा एकदा देशातील कापूस उत्पादक संकटात सापडला आहे. यावर्षी पाऊस उशिरा आल्यामुळे पेरणीसही उशीर झाला. त्यामुळे शेतकर्‍यांचे एकरी उत्पादन घटले अशा परिस्थितीत सध्या कापसाला असलेला अल्पभाव यामुळे एकरी खर्चसुद्धा निघेनासा झाला आहे. त्यामुळे नवीन सरकारनेसुद्धा शेतकर्‍यांच्या तोंडास पानेच पुसली आहे, अशी सर्वसामान्यांना आता जाणीव झाली असून, नवीन सरकार जुन्याच सरकारच्या वाटेवर धावत असल्यामुळे शेतकर्‍यांनी ठिकठिकाणी आता नवीन सरकारच्या कापूस नीतीचा विरोध करण्यासाठी कापसांची गावागावात होळी पेटविण्याचे ठरविले आहे. आंदोलनकर्ते जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत केंद्र सरकारला जळलेला कापूस भेट करणार तसेच दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांनाही देणार असल्याचे राष्ट्रीय किसान जागृती अभियानाचे प्रमुख अभिमन्यू भारतीय यांनी दिली. यावेळी अमोल धानोरकर, अभिमन्यू भारतीय, लक्ष्मणराव सोळंके, कैलास गोटे यांच्या नेतृत्वात कापूस जळून केंद्र सरकारच्या कृषीविरोधी धोरणांचा निषेध सर्व कोकलगांववासीयांनी केला.