शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शेतक-यांनी केली कापसाची होळी

By admin | Updated: December 30, 2014 00:41 IST

केंद्र सरकारच्या कापूस धोरणाचा निषेध

वाशिम : राष्ट्रीय किसान जागृती अभियानाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कापूस नीतीचा विरोध करीत गावागावात कापसाची होळी करून आपला निषेध नोंदवला. तालुक्यातील ग्राम कोकलगाव येथे २८ डिसेंबर रोजी कापूस जाळण्यात आला.कापसाची होळी या आंदोलनात परिसरातील शेतकर्‍यांनी उपस्थित राहून आपले सर्मथन दर्शवले. मागील सरकारच्या काळात देशातील व प्रामुख्याने विदर्भातील कापूस उत्पादकांचे मोठे बेहाल झाले होते. परिणामी देशात व प्रामुख्याने विदर्भात कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या मोठय़ा प्रमाणात आत्महत्याही झाल्या. या शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा समोर करून सत्तेत आलेल्या नवीन सरकारनेही आता जुन्याच सरकारच्या नीती धोरणांचा अवलंब केल्याने पुन्हा एकदा देशातील कापूस उत्पादक संकटात सापडला आहे. यावर्षी पाऊस उशिरा आल्यामुळे पेरणीसही उशीर झाला. त्यामुळे शेतकर्‍यांचे एकरी उत्पादन घटले अशा परिस्थितीत सध्या कापसाला असलेला अल्पभाव यामुळे एकरी खर्चसुद्धा निघेनासा झाला आहे. त्यामुळे नवीन सरकारनेसुद्धा शेतकर्‍यांच्या तोंडास पानेच पुसली आहे, अशी सर्वसामान्यांना आता जाणीव झाली असून, नवीन सरकार जुन्याच सरकारच्या वाटेवर धावत असल्यामुळे शेतकर्‍यांनी ठिकठिकाणी आता नवीन सरकारच्या कापूस नीतीचा विरोध करण्यासाठी कापसांची गावागावात होळी पेटविण्याचे ठरविले आहे. आंदोलनकर्ते जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत केंद्र सरकारला जळलेला कापूस भेट करणार तसेच दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांनाही देणार असल्याचे राष्ट्रीय किसान जागृती अभियानाचे प्रमुख अभिमन्यू भारतीय यांनी दिली. यावेळी अमोल धानोरकर, अभिमन्यू भारतीय, लक्ष्मणराव सोळंके, कैलास गोटे यांच्या नेतृत्वात कापूस जळून केंद्र सरकारच्या कृषीविरोधी धोरणांचा निषेध सर्व कोकलगांववासीयांनी केला.