शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छतेसाठी नगरसेवकाचा पुढाकार

By admin | Updated: June 2, 2017 15:39 IST

विरेंद्रसिंह ठाकूर यांनी आपल्या प्रभागात स्वत:च नाली सफाईचे काम करून जनतेसह पालिका कर्मचाºयांपुढे आदर्श ठेवला आहे. 

जनतेसमोर आदर्श: मंगरुळपीर पालिकेचे गटनेते विरेंद्रसिंह ठाकूर यांचा उपक्रम मंगरुळपीर ; तोंडावर आलेल्या पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर साफसफाईची कामे करण्याची मागणी शहरातील जनतेकडून जोर धरत असताना मंगरुळपीर येथील नगरसेवक तथा भाजप गटनेते विरेंद्रसिंह ठाकूर यांनी पालिका प्रशासनाच्या तयारीची प्रतिक्षा न करता आपल्या प्रभागात स्वत:च नाली सफाईचे काम करून जनतेसह पालिका कर्मचाऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. अलिकडच्या काळात सत्तेत असो वा विरोधी बाकावर, लोकप्रतिनिधी केवळ सल्ला देऊन मोकळे होणे आणि सभा बोलावून आपल्या कामांची बतावणी करण्यापलिकडे फारसे काही करण्यात उत्साही नसल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. विरोधात असताना सत्ताधारी गटाच्या धोरणाबाबत आरडाओरड करणे किंवा प्रशासनाच्या चुकांचा पाढा वाचणे, हे प्रकारही पाहायला मिळतात; परंतु अधिकार आणि पदाची दुसरी बाजू कर्तव्य आहे, याचा मात्र लोकप्रतिनिधींना पद्धतशीर विसर पडला असतो. याला काही अपवादही आहेत. त्यामध्ये मंगरुळपीर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा विद्यमान नगरसेवक विरेंद्रसिंह ठाकूर यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांत मंगरुळपीर शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांच्या मानंत प्रचंड निराशा आणि रोषाचे वातावरण आहे. त्यात पावसाळा तोंडावर असताना पालिका प्रशासनाने संभाव्य रोगराईला आवर घालण्यासाठी मान्सूनपूर्व कामे करणे गरजेचे आहे. त्यामध्ये ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिग साफ करणे, नाल्या उपसणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे आणि स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य लाभण्याचे आवाहन करणे, आदिंचा प्रामुख्याने समावेश होतो; परंतु मंगरुळपीर शहरात ३१ मेपर्यंतही त्याला प्रारंभ झाला नसल्याने पालिका प्रशासनासह त्यांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यतत्परतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशात विरेंद्रसिंह ठाकूर यांनी मान्सूनपूर्व कामे करण्याचा आग्रह पालिका प्रशासनाकडे धरला होता; परंतु त्याला प्रतिसाद लाभत नसल्याने त्यांनी चक्क स्वत:च हाती फावडे घेत नाल्या सफाईचे काम सुरू केले आणि शहराच्या जुन्या वस्तीमधील नाली पूर्ण साफ केली. विरेंद्रसिंह ठाकूर हे स्वत: प्रगतशील शेतकरीही आहेत शिवाय सामाजिकतेची ओढही त्यांना असल्याने त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढली आणि केवळ उभे राहून इतरांवर ताशेरे ओढण्यापेक्षा स्वत:च स्वच्छतेबाबत पुढाकार घेत तमाम जनतेसमोर आदर्श निर्माण केला.