शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात स्थलांतरीत कामगारांच्या माहितीसाठी घरोघर भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:58 IST

पोलीस पाटलांनी महानगरांतून परत गावी आलेल्या कामगारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परदेश, महानगरातून गावी परतलेल्या नागरिक, कामगारांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण़्याची शक्यता असल्याने या नागरिक, कामगारांची माहिती संकलित करण़्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशानुसार प्रत्येक पोलीस पाटील आणि ग्रामसेवक घरोघर फिरून कामगारांची माहिती घेत असल्याचे, तसेच स्थलांतरीत कामगारांना तपासणी व माहितीचे आवाहन करण्यासाठी ग्रामपंचायतकडून दवंडी देण्यात येत असल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळालेमहाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम १९६७ मधील कलम ६ (१) अन्वये पोलीस पाटील हे कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काम करतील, असे नमूद आहे. कलम ६ (३) अन्वये गावातील सामाजिक स्वास्थ्य व त्याच्या सर्वसाधारण परिस्थितीविषयी अशा कार्यकारी दंडाधिकाºयांना नियमितपणे माहिती देणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत नोवेल कोरोना १९ या विषाणूच्या संसगार्चे प्रमाण महाराष्ट्रात दिसून येत असून, परदेशात गेलेल्या नागरिकांसह पुणे व मुंबई या सारख्या महानगरातून गावाकडे परत येणाºया ईसमांना नोवेल कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याने परदेशातून, तसेच मुंबई, पुणे, अशा महानगरातून परत आलेल्या नागरिकांची माहिती तालुक्याचे तालुका दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकाºयांना कळविण्याचे आदेश पोलीस पाटलांना देण्यात आले आहेत, तसेच सदरची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाºयांसह निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या ईमेल आयडीवरही कळविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परतलेल्या स्थलांतरीतचा पूर्ण नाव, पत्ता, कोठे उतरला त्याचे ठिकाण, गाडी कोण्या शहरातून आली, त्या गावाचे, शहराचे नाव, आदि माहिती पोलीस पाटलांना घ्यावी लागत असून, या आदेशानुसार शुक्रवार जिल्हाभरातील पोलीस पाटलांनी महानगरांतून परत गावी आलेल्या कामगारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले.सहाशेहून अधिक लोकांची माहिती संकलितमहानगरातून गावी परत येत असलेल्या नागरिकांची इत्तंभूत माहिती संकलित करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाºयांनी पोलीस पाटलांना दिल्यानंतर सहाही तालुक्यातील पोलीस पाटलांनी मिळून शुक्रवारी सहाशेपेक्षा अधिक लोकांची माहिती संकलित करून ती तहसीलदारांकडे सादर केली. ही मोहिम पुढेही सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस