शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus : परजिल्ह्यातून आलेल्या ५२८ नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:35 IST

२० ते २३ मार्च या दरम्यान मानोरा व मालेगाव या दोन तालुक्यात ५२८ जणांची आरोग्य तपासणी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परदेश, महानगरातून वाशिम जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती गावपातळीवर संकलित केली जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळून येणाºया नागरिकांची सरकारी रुग्णालयात तपासणी केली जात आहे. २० ते २३ मार्च या दरम्यान मानोरा व मालेगाव या दोन तालुक्यात ५२८ जणांची आरोग्य तपासणी केली. सध्या सर्व जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असनू, प्रत्येक जणांना खबरदारी घेण्याचे आवाहन केंद्र व राज्य सरकारच्यावतीने केले जात आहे.  परजिल्ह्यातून मालेगाव तालुक्यात येणाºया नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे दिसून येताच ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली जात आहे. २० ते २३ मार्च या दरम्यान तालुक्यातील २०२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. मालेगाव शहरातील पुणे-मुंबई तसेच परदेशातून आलेल्यांपैकी केवळ  पाच  रुग्ण तपासणीसाठी आले आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मालेगाव नगरपंचायतने पुणे, मुंबईवरून आलेल्या कोणत्याच माणसांची नोंद ठेवली नाही तसेच त्यांना तपासणीकरिता तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात नेले नाही. मालेगाव शहरातील अनेक युवक-युवती शिक्षणासाठी पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या महानगरात गेले होते. तर काही नागरिक कामानिमित्त पुणे, मुंबई गेले होते. आता सर्व जण परत येत असून, तपासणी केली जात आहे. मात्र, शहरातील नागरिक आरोग्य तपासणीबाबत उदासिन असल्याचे दिसून येते. केवळ पाच जणांनी आरोग्य तपासणी केली आहे.मानोरा तालुक्यात १५ मार्च ते २३ मार्च या दरम्यान ३२६ जणांची आरोग्य तपासणी केली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. १५ मार्च रोजी पुणे व मुंबई येथून आलेल्या प्रत्येकी एक अशा दोन जणांची आरोग्य तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. १८ मार्च रोजी नाशिक येथून आलेले दोन नागरीक, १९ मार्च रोजी पुणे ३३ व मुंबई २३, २० मार्च रोजी पुणे २४, मुंबई २३, औरंगाबाद २, २१ मार्च रोजी पुणे ५९, मुंबई २४, नांदेड २ व अहमदनगर ९, २२ मार्च रोजी पुणे ४३, मुंबई १३, चंद्रपूर १, नागपूर २, जालना २, २३ मार्च रोजी पुणे ४६, मुंबई ९, वर्धा ३, कलकत्ता १, नागपूर ३ अशा एकूण ३२६ जणांची ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

 मालेगाव तालुक्यातील २०२ नागरिकाचंी आरोग्य तपासणी करून गेले. मात्र २५ हजार लोकसंख्या असलेल्या मालेगाव शहरात पुणे, मुंबई वरून आलेल्या  केवळ ५  व्यक्ती  तपासणीकरीता आले होते. बाहेर गावावरून आलेल्यांना काही लक्षणे असली तरी त्यांनी इतर व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. किमान १४ दिवस घरातच राहावे, तपासणी करून घ्यावी.    - डॉ. संदीप वाढवे  ग्रामीण रुग्णालय मालेगाव  नगर पंचायत कार्यालयामार्फत मालेगाव शहरात महानगरातून आलेल्या व्यक्तींची नोंद प्रभागनिहाय घेतली जाणार असून त्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.  नागरिकांनी सुद्धा नगर पंचायतमध्ये नोंद करून तपासनी करून घ्यावी. कोणाला अशी काही माहिती असल्यास कळवावे. - डॉ. विकास खंडारे, मुख्याधिकारी, नगर पंचायत मालेगाव

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwashimवाशिम